शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी भूखाते पुस्तिका कालबाह्य

By admin | Updated: May 8, 2014 03:01 IST

शेतकऱ्यांची पदोपदी होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी महाराष्टÑ शासनाकडून सर्वस्तरावर काळजीपूर्वक विचार करून

गोंदिया : शेतकर्‍यांची पदोपदी होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी महाराष्टÑ शासनाकडून सर्वस्तरावर काळजीपूर्वक विचार करून एक परिपूर्ण व वैधानिक असलेली कृषी भूखाते पुस्तिका तयार करुन ती शेतकर्‍यांना पुरविण्यात आली होती. मात्र आज रोजी ही पुस्तिका कालबाह्य झाल्याचे दिसत आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सन १९७६ मध्ये शेतकर्‍यांची पिळवणूक थांबविण्यासाठी महसूल विभागाला आदेश देऊन एक कृषी भूखाते पुस्तिका तयार करुन ती शेतकर्‍यांना देण्याबाबत सुचविले होते. त्यावर तत्काळ शेतकर्‍यांना तशी पुस्तिका पुरविण्यातही आली होती. या पुस्तिकेत मालक, अन्य अधिकार, जमीन बाब, तगाई, अन्य सरकारी वसुली, सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील, अन्नधान्य वसुली ही माहिती असायची. तसेच शेतकर्‍यांना वरचेवर तलाठ्याला पैसे देऊन गाव नमूना ७/१२ घ्यावा लागत असल्यामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत होती. म्हणून महाराष्टÑ जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करुन नव्या खाते पुस्तिकेतील अधिकारी अभिलेखांना (गाव नमूना ७/१२) वैधता देण्यात आली होती. त्यामुळे तलाठ्यांकडून ७/१२ वैधता देण्यात आली होती व ७/१२ च्या नकला वरचेवर मिळवण्याची गरज शेतकर्‍याला पडत नव्हती. संबंधित अधिकार्‍यांकडे खाते पुस्तिका हजर केल्यावर तो आवश्यक त्या नोंदी संबंधित प्रकरणात उतरुन घेत असे. जेथे गाव नमूना ७/१२ च्या नकलाची आवश्यकता भासत असे, तेथे शेतकर्‍यांना स्वत:च्या खाते पुस्तिकेतील उतार्‍यावरुन नकला करुन घेता येत होत्या.

आॅगस्ट किंवा डिसेंबर महिन्यात तलाठ्याकडे सदर खाते पुस्तिका देऊन नोंदी अद्ययावत करुन घेणे महत्वाचे होते. सदर पुस्तिका तयार करण्यासाठी १९७१ अन्यवे नियम बनविण्यात आले होते. त्यामध्ये नियम ३ अन्वये शेतकर्‍यांचा अर्ज मिळाल्यावर नियमांच्या उपबंधास अधिन राहून तलाठी अर्जाच्या तारेखच्या लगतपूर्वीच्या महसूली वर्षापासून पुस्तिका तयार करणे व नियम १० अन्वये उपबंधीत केल्याप्रमाणे पुस्तिकेत प्रमाणपत्राची नोंद करणे बंधनकारक होते. आता हे सर्व कालबाह्य झाले असून त्यानंतर शेतकर्‍यांना ज्या वेळेस ७/१२ लागेल त्यावेळेस तलाठ्यास १० ते २० रुपये द्यावे लागत होते. या पैशाची कोणतीही पावती शेतकर्‍यास मिळत नव्हती. तलाठी हा त्याच्या पगारापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पैसा कमवित होता. मात्र यावर कोणत्याही शेतकर्‍याचा आक्षेप नव्हता. जो तलाठी हजर राहत नसे किंवा ७/१२ साठी मागे फिरवत असे अशा तलाठ्याबाबत तक्रारी व्हायच्या. शासनाला ही बाब शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे अशी वाटली आणि आता ७/१२ हा सेतू केंद्रातून मिळणार असल्याने शेतकर्‍यांना २५ ते १०० रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच शेतकर्‍यांची अजून पिळवणूक करायची की थांबवायची हे शासनाने स्पष्ट करावे . (शहर प्रतिनिधी)