शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

मध्य प्रदेशातील प्रवेशबंदीमुळे आगाराला १० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

कपील केकत गोंदिया : कोरोना प्रादुर्भाव पाहता, मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला लावलेली प्रवेशबंदी आणखी वाढविली आहे. परिणामी, एप्रिल ...

कपील केकत

गोंदिया : कोरोना प्रादुर्भाव पाहता, मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातील बसेसला लावलेली प्रवेशबंदी आणखी वाढविली आहे. परिणामी, एप्रिल महिन्यापासून आगाराच्या मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. अशात आगाराला या महिन्यांत सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, फेऱ्या बंद असल्यामुळे मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चांगलीच अडचण होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला बघता मध्य प्रदेश शासनाने एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रातील बसेसला प्रवेशबंदी केली होती. त्यात मध्य प्रदेश शासनाकडून दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. २१ जुलैपर्यंत असलेली ही प्रवेशबंदी आत वाढवून २८ जुलैपर्यंत करण्यात आली असून, एकंदर हा महिनाही गेला. अशात मागील ४ महिन्यांपासून प्रवेशबंदी असल्यामुळे गोंदिया आगाराला दरमहा सुमारे २.५० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. म्हणजेच, एप्रिल, मे, जून व आता जुलै अशा या ४ महिन्यांत आगाराला सुमारे १० लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

मध्य प्रदेश राज्याची सीमा येथून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असून, गोंदियाची बाजारपेठ ‘मिनी मुंबई’ म्हणून ओळखली जात असल्याने, मध्य प्रदेश राज्यातील नागरिक खरेदीसाठी येथेच येतात, शिवाय गोंदिया व बालाघाट जिल्ह्याचे नातेही जुने असल्याने नागरिकांनी रोजची ये-जा सुरूच असते. मात्र, मध्य प्रदेश शासनाच्या निर्णयामुळे बसफेऱ्या बंद असून, यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांचीच अडचण होत आहे.

-------------------------

आगाराच्या आहेत २७ फेऱ्या

गोंदिया आगारातून मध्य प्रदेशात दररोज २७ फेऱ्यांचे नियोजन आहे. यात १९ फेऱ्या बालाघाट, १ फेरी लांजी, ५ फेऱ्या रजेगाव तर २ फेऱ्या मलाजखंडच्या आहेत. अशा एकूण २७ फेऱ्या आगारातून मध्य प्रदेश राज्यात सोडल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे फेऱ्यांवर बंदी असल्यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांची प्रवासाला घेऊन अडचण होत आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील नागरिकांना खरेदी, उपचार व नात्यागोत्यांसाठी गोंदियात यावे लागते, शिवाय नागपूर येथे कामानिमित्त जावे लागत असून, त्यांच चांगलीच अडचण होत आहे.

---------------------------

गोंदिया-बालाघाटचे रोटी-बेटीचे नाते

गोंदिया व बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांचे व्यावसायिक संबंध असतानाच, रोटी-बेटीचे नातेही या दोन जिल्ह्यांत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील कित्येकांचे नातेवाईक येथे आहेत, शिवाय गोंदियाची बाजारपेठ मोठी असल्याने बालाघाट व गोंदियाचे व्यावसायिक संबंधही आहेत. मात्र, कोरोनाच्या ग्रहणामुळे यावर परिणाम जाणवत आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहन आहेत, त्यांचे ठीक आहे. मात्र, ज्यांना एसटीनेच प्रवास करावा लागत होता, त्यांची अडचण होत आहे.

रोटी-बेटीचे नाते