शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावात पुन्हा अवैध दारूची विक्री जोमात

By admin | Updated: April 20, 2017 01:06 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून

परवानाप्राप्त दारू दुकान बंदीमुळे फावले : पुनर्मूल्यांकन न झाल्याने समित्या उदासीन गोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने हा उपक्रम चालवून अवैध दारू बंद केली होती. परंतु आता पुन्हा ही अवैध दारू जोमाने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचा पुरस्कार घेतल्यानंतर आता शासन गावांचे पुनर्मूल्यांकन करीत नसल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या उदासीन झाल्या आहेत. परिणामी त्यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड होण्याची स्थिती पुन्हा येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय.एस. १००७/सी.आर. २३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस. १००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. शासनाला तंटामुक्त समित्यांनी तीन वर्षाने तंटामुक्त गावांचे पुनर्रमुल्यांकण करून त्या मुल्यांकणात पात्र ठरलेल्या गावांना बक्षीस म्हणून पहिल्यावेळी दिलेल्या बक्षीसाच्या रकमेची २५ टक्के रक्कम प्रोत्साहित राशी म्हणून देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु सतत होणाऱ्या या मागणीकडे शासनाने लक्ष न दिल्याने तंटे सोडविण्यात किंवा गावातील अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या मागे पडल्या आहेत. परिणामी गावात अवैध दारूची दुकाने आता गल्ली-गल्लीत सुरू होत आहेत. या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित वातावरण होण्यास सुरूवात होत आहे. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) तंटामुक्तीला पोलीस मित्रांचा लाभ नाही गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. आता पोलीस विभागाने पोलीस मित्र उपक्रम सुरू केला आहे त्याचा लाभ तंटामुक्त मोहीमेला झाला नाही. गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम काम करते. तसेच गावागावातील पोलीस मीत्र शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस मित्र तयार करण्यात आले. गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीला पोलीस मित्र नक्कीच मदत करणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच होता. परंतु पोलीस मित्र संकल्पना कागदावरच दिसत आहे.