शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

तंटामुक्त गावात पुन्हा अवैध दारूची विक्री जोमात

By admin | Updated: April 20, 2017 01:06 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून

परवानाप्राप्त दारू दुकान बंदीमुळे फावले : पुनर्मूल्यांकन न झाल्याने समित्या उदासीन गोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने हा उपक्रम चालवून अवैध दारू बंद केली होती. परंतु आता पुन्हा ही अवैध दारू जोमाने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचा पुरस्कार घेतल्यानंतर आता शासन गावांचे पुनर्मूल्यांकन करीत नसल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या उदासीन झाल्या आहेत. परिणामी त्यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड होण्याची स्थिती पुन्हा येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय.एस. १००७/सी.आर. २३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस. १००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. शासनाला तंटामुक्त समित्यांनी तीन वर्षाने तंटामुक्त गावांचे पुनर्रमुल्यांकण करून त्या मुल्यांकणात पात्र ठरलेल्या गावांना बक्षीस म्हणून पहिल्यावेळी दिलेल्या बक्षीसाच्या रकमेची २५ टक्के रक्कम प्रोत्साहित राशी म्हणून देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु सतत होणाऱ्या या मागणीकडे शासनाने लक्ष न दिल्याने तंटे सोडविण्यात किंवा गावातील अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या मागे पडल्या आहेत. परिणामी गावात अवैध दारूची दुकाने आता गल्ली-गल्लीत सुरू होत आहेत. या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित वातावरण होण्यास सुरूवात होत आहे. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) तंटामुक्तीला पोलीस मित्रांचा लाभ नाही गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. आता पोलीस विभागाने पोलीस मित्र उपक्रम सुरू केला आहे त्याचा लाभ तंटामुक्त मोहीमेला झाला नाही. गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम काम करते. तसेच गावागावातील पोलीस मीत्र शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस मित्र तयार करण्यात आले. गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीला पोलीस मित्र नक्कीच मदत करणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच होता. परंतु पोलीस मित्र संकल्पना कागदावरच दिसत आहे.