शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर खाद्यतेलांचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे ...

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे लॉकडाऊन करावा लागल्याने वस्तूंचे उत्पादन व वितरणही ठप्प पडले होते. त्यानंतर सर्व काही सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली. यंदा उत्पादन बंद ठेवण्यात आले नव्हते. मात्र, काम करणारी माणसेच असल्याने उत्पादनावर परिणाम झालाच. याचा परिणाम सर्वच वस्तूंवर पडत असतानाच दररोजच्या जीवनात उपयोगी खाद्यतेलांना चांगलाच बसला. मागील वर्षभरापासून खाद्यतेलांचे भाव चांगलेच कडाडले असल्याने त्याचा परिणाम घरातील स्वयंपाकखोलीवर जाणवत आहे. जेवण म्हटले म्हणजे तेलाचा वापर आलाच व खाद्यतेल कडाडल्याने काय खावे-काय नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, आता खाद्यतेलांची देशात आयात होत असल्याने खाद्यतेलांचे भाव उतरले असून याचा सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सध्या नेपाळ येथून खाद्यतेलाची आयात होत असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत. यामुळे वर्षभरानंतर खाद्यतेलांचे दर उतरले असून चमचमीत खाणाऱ्यांसाठी ही गुड न्यूजच ठरणार आहे.

-----------------------------

सूर्यफुुल- १७५- १८०

सोयाबीन - १५५- १६०

शेंगदाणा- १८०- १८५

पाम- १४०-१५०

सरसो- १९५- २००

-----------------------------------

गृहिणींसाठी ‘गुड न्यूज’

कोरोना संकटाने सर्वच काही अस्ताव्यस्त करून टाकले. जीवितहानी होत असतानाच देशाची अर्थव्यवस्थाही होरपळून गेली आहे. मागील वर्षभरापासून महागाईने डोळे वटारले असून खाद्यतेलांचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम प्रत्येकच घरावर पडला आहे. आता आयात वाढल्यामुळे तेलांचे भाव उतरत असल्याने गृहिणींसाठी नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे.

-----------------------------------

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

पूर्वी आमच्या वाडवडिलांच्या काळात फक्त मीठ बाहेरून घ्यावे लागत होते. कित्येक शेतकऱ्यांच्या घरातच खाद्यतेलही निघत होते. आता मात्र शेतीची पद्धतही बदलली असून आता काही मोजक्याच वस्तू घरात निघतात. तर, बहुतांश वस्तूंसाठी बाजाराची धाव घ्यावी लागत आहे.

- मंसाराम चिखलोंडे (शेतकरी)

-------------------------

पूर्वी घरातल्या शेतातच खाण्याच्या वस्तूंचे उत्पादन घेतले जात होते. घरासाठी तेलीय पिकांचे उत्पादन घेतले जात होते व ते घरीच खायच्या कामी येत होते. आता बदलत्या काळानुसार शेतीची पद्धत बदलली आहे. यामुळे धानासह अन्य एखादे पीक घेतले जात आहे.

- निहारीलाल दमाहे (शेतकरी)