शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

वर्षभरानंतर खाद्यतेलांचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे ...

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे लॉकडाऊन करावा लागल्याने वस्तूंचे उत्पादन व वितरणही ठप्प पडले होते. त्यानंतर सर्व काही सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली. यंदा उत्पादन बंद ठेवण्यात आले नव्हते. मात्र, काम करणारी माणसेच असल्याने उत्पादनावर परिणाम झालाच. याचा परिणाम सर्वच वस्तूंवर पडत असतानाच दररोजच्या जीवनात उपयोगी खाद्यतेलांना चांगलाच बसला. मागील वर्षभरापासून खाद्यतेलांचे भाव चांगलेच कडाडले असल्याने त्याचा परिणाम घरातील स्वयंपाकखोलीवर जाणवत आहे. जेवण म्हटले म्हणजे तेलाचा वापर आलाच व खाद्यतेल कडाडल्याने काय खावे-काय नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, आता खाद्यतेलांची देशात आयात होत असल्याने खाद्यतेलांचे भाव उतरले असून याचा सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सध्या नेपाळ येथून खाद्यतेलाची आयात होत असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत. यामुळे वर्षभरानंतर खाद्यतेलांचे दर उतरले असून चमचमीत खाणाऱ्यांसाठी ही गुड न्यूजच ठरणार आहे.

-----------------------------

सूर्यफुुल- १७५- १८०

सोयाबीन - १५५- १६०

शेंगदाणा- १८०- १८५

पाम- १४०-१५०

सरसो- १९५- २००

-----------------------------------

गृहिणींसाठी ‘गुड न्यूज’

कोरोना संकटाने सर्वच काही अस्ताव्यस्त करून टाकले. जीवितहानी होत असतानाच देशाची अर्थव्यवस्थाही होरपळून गेली आहे. मागील वर्षभरापासून महागाईने डोळे वटारले असून खाद्यतेलांचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम प्रत्येकच घरावर पडला आहे. आता आयात वाढल्यामुळे तेलांचे भाव उतरत असल्याने गृहिणींसाठी नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे.

-----------------------------------

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

पूर्वी आमच्या वाडवडिलांच्या काळात फक्त मीठ बाहेरून घ्यावे लागत होते. कित्येक शेतकऱ्यांच्या घरातच खाद्यतेलही निघत होते. आता मात्र शेतीची पद्धतही बदलली असून आता काही मोजक्याच वस्तू घरात निघतात. तर, बहुतांश वस्तूंसाठी बाजाराची धाव घ्यावी लागत आहे.

- मंसाराम चिखलोंडे (शेतकरी)

-------------------------

पूर्वी घरातल्या शेतातच खाण्याच्या वस्तूंचे उत्पादन घेतले जात होते. घरासाठी तेलीय पिकांचे उत्पादन घेतले जात होते व ते घरीच खायच्या कामी येत होते. आता बदलत्या काळानुसार शेतीची पद्धत बदलली आहे. यामुळे धानासह अन्य एखादे पीक घेतले जात आहे.

- निहारीलाल दमाहे (शेतकरी)