शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

वर्षभरानंतर खाद्यतेलांचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे ...

गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे लॉकडाऊन करावा लागल्याने वस्तूंचे उत्पादन व वितरणही ठप्प पडले होते. त्यानंतर सर्व काही सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली. यंदा उत्पादन बंद ठेवण्यात आले नव्हते. मात्र, काम करणारी माणसेच असल्याने उत्पादनावर परिणाम झालाच. याचा परिणाम सर्वच वस्तूंवर पडत असतानाच दररोजच्या जीवनात उपयोगी खाद्यतेलांना चांगलाच बसला. मागील वर्षभरापासून खाद्यतेलांचे भाव चांगलेच कडाडले असल्याने त्याचा परिणाम घरातील स्वयंपाकखोलीवर जाणवत आहे. जेवण म्हटले म्हणजे तेलाचा वापर आलाच व खाद्यतेल कडाडल्याने काय खावे-काय नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, आता खाद्यतेलांची देशात आयात होत असल्याने खाद्यतेलांचे भाव उतरले असून याचा सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सध्या नेपाळ येथून खाद्यतेलाची आयात होत असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत. यामुळे वर्षभरानंतर खाद्यतेलांचे दर उतरले असून चमचमीत खाणाऱ्यांसाठी ही गुड न्यूजच ठरणार आहे.

-----------------------------

सूर्यफुुल- १७५- १८०

सोयाबीन - १५५- १६०

शेंगदाणा- १८०- १८५

पाम- १४०-१५०

सरसो- १९५- २००

-----------------------------------

गृहिणींसाठी ‘गुड न्यूज’

कोरोना संकटाने सर्वच काही अस्ताव्यस्त करून टाकले. जीवितहानी होत असतानाच देशाची अर्थव्यवस्थाही होरपळून गेली आहे. मागील वर्षभरापासून महागाईने डोळे वटारले असून खाद्यतेलांचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम प्रत्येकच घरावर पडला आहे. आता आयात वाढल्यामुळे तेलांचे भाव उतरत असल्याने गृहिणींसाठी नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे.

-----------------------------------

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

पूर्वी आमच्या वाडवडिलांच्या काळात फक्त मीठ बाहेरून घ्यावे लागत होते. कित्येक शेतकऱ्यांच्या घरातच खाद्यतेलही निघत होते. आता मात्र शेतीची पद्धतही बदलली असून आता काही मोजक्याच वस्तू घरात निघतात. तर, बहुतांश वस्तूंसाठी बाजाराची धाव घ्यावी लागत आहे.

- मंसाराम चिखलोंडे (शेतकरी)

-------------------------

पूर्वी घरातल्या शेतातच खाण्याच्या वस्तूंचे उत्पादन घेतले जात होते. घरासाठी तेलीय पिकांचे उत्पादन घेतले जात होते व ते घरीच खायच्या कामी येत होते. आता बदलत्या काळानुसार शेतीची पद्धत बदलली आहे. यामुळे धानासह अन्य एखादे पीक घेतले जात आहे.

- निहारीलाल दमाहे (शेतकरी)