शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांनंतर आता गावातील अंधार होणार दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत पथ दिवे लावण्यात आले आहे. या पथदिव्यांचे देयके हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. सन २००३ पासून जिल्हा परिषदच याचा भरणा करीत होती. मात्र सन २०२१ मध्ये शासनाने गावातील विद्युत पथदिव्यांचे देयके ही ग्रामपंचायतने भरावे, असे आदेश काढले आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायती अडचणीत आल्या होत्या. एका एका ग्रामपंचायतीकडे एक ते दीड लाख रुपयांची थकीत बाकी होती. ही रक्कम ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे आदेश शासनाने काढले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  गावातील विद्युत पथदिव्यांचे बिल पूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात होते. मात्र चार महिन्यांपूर्वी यात शासनाने बदल केल्याने अनेक गावातील विद्युत पथदिव्यांचा वीजपुरवठा थकीत देयकामुळे खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर या विरोधात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती आणि संरपचांनी आंदोलन छेडले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ नाेव्हेंबर २०२१ काढलेल्या जीआरनुसार आता गावातील विद्युत पथदिव्यांचे बिल पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. यामुळे केवळ गोंदिया जिल्हाच नव्हे राज्यातील २६ हजारांवर ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत पथ दिवे लावण्यात आले आहे. या पथदिव्यांचे देयके हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. सन २००३ पासून जिल्हा परिषदच याचा भरणा करीत होती. मात्र सन २०२१ मध्ये शासनाने गावातील विद्युत पथदिव्यांचे देयके ही ग्रामपंचायतने भरावे, असे आदेश काढले आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायती अडचणीत आल्या होत्या. एका एका ग्रामपंचायतीकडे एक ते दीड लाख रुपयांची थकीत बाकी होती. ही रक्कम ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे आदेश शासनाने काढले होते. मात्र विकास कामांचा निधी विद्युत देयकासाठी भरल्यानंतर विकास कामे कशी करायची असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती करीत जिल्हा परिषदेनेच या बिलाचा भरणा करावा अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे महावितरणने आक्रमक भूमिका घेत थकीत वीज देयकामुळे अनेक गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. दिवाळीत सुध्दा गावात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त होता. सरपंच संघटनेने सुध्दा या विरोधात आंदोलन छेडले होते. याचीच दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ नाेव्हेंबरला या संदर्भातील जीआर काढून ग्रामपंचायतच्या विद्युत पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा जिल्हा परिषदेने करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे तब्बल चार महिन्यांच्या लढ्यानंतर गावातील अंधार दूर होणार आहे. 

निर्णयाचे केले स्वागत - ग्रामपंचायतच्या विद्युत पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणपूर्वी प्रमाणेच जिल्हा परिषदेने करावा, जी प्रक्रिया पूर्वी सुरू होती त्याचप्रमाणे ती सुरू ठेवण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्यांनी स्वागत केले आहे. विकास कामावर करता येणार निधी - ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगांतर्गत विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. याच निधीतून वीज देयके भरण्याचे आदेश दिल्याने ग्रामपंचायती अडचणीत आल्या होत्या. मात्र यात आता बदल केल्याने ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.

अंधार दूर होणारराज्य शासनाने गावांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. गावातील दिवाबत्ती संबंधाने गेल्या २-३ महिन्यांपासून मोठी ओरड सुरू होती. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही बाब सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली व शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.           - गंगाधर परशुरामकर  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  

राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गावातील पथदिव्यांच्या देयकांचा प्रश्न निकाली निघाल्याने हा निर्णय स्वागतार्ह आहे.               -डॉ. दीपक रहेले   उपाध्यक्ष, सरपंच संघटना गोंदिया

 

टॅग्स :electricityवीज