शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

परतीच्या पावसामुळे घात

By admin | Updated: October 9, 2016 00:43 IST

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना ..

धानाचे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जाणारगोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना पावसाने पिच्छा सोडलेला नाही. आता हलका धान ऐन कापणीवर असताना काही भागात पावसाने थैमान घातल्यामुळे हाती येत असलेला धान वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सौंदड शिवारातील शेतकरी चिंतेतसौंदड : सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने हलक्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एक हजार दहा, पाटरु, आर.पी.एन., एक हजार एक या जातीच्या धानाचे आणि फुलोऱ्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने फुलोरा झाडून टाकला. तसेच आलेले धान जमिनीवर लोळत पडल्याने धान फोल होण्यासोबत त्याला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली नाही. पावसाने आठवडाभर उसंत दिल्यास हलक्या जातीच्या धानाच्या कापणीला सुरुवात होईल. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेल्या धानपिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे धान मळणीनंतर फेडरेशनच्या मार्फत शासनाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये न घालता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (लोकमत चमू)इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणार?गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले इडियाडोह धरण गेल्या दोन ३ वर्षांपासून ओव्हरफ्लो झाले नाही. गेल्यावर्षी तर हे धरण ४० टक्केही भरले नव्हते. त्यामुळे रबी हंगामात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यावर्षीसुद्धा सप्टेंबर अखेरपर्यंत हे धरण भरण्याची शाश्वती नव्हती. मात्र आॅक्टोबर महिन्यातही अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे हे धरण ९७ टक्के भरले आहे. शनिवारच्या सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हलक्या धानाचे नुकसानपांढरी : यावर्षी सर्वच शेतामधील हलके धान्य बहरलेले आहे. आठ ते दहा दिवसामध्ये धान कापणीवर येणार आहे. त्यापूर्वीच पावसाच्या फटकामुळे धान जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना धानाचा फटका बसताना दिसत आहे. पूर्वीपासूनच शेतकरी कर्जाचा बोझे घेवून कसेबसे शेतकरुन आपली उपजिविका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैसर्गिक बाबीमुळे मात घालताना दिसत आहे. शासनाने झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.