शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे घात

By admin | Updated: October 9, 2016 00:43 IST

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना ..

धानाचे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जाणारगोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना पावसाने पिच्छा सोडलेला नाही. आता हलका धान ऐन कापणीवर असताना काही भागात पावसाने थैमान घातल्यामुळे हाती येत असलेला धान वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सौंदड शिवारातील शेतकरी चिंतेतसौंदड : सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने हलक्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एक हजार दहा, पाटरु, आर.पी.एन., एक हजार एक या जातीच्या धानाचे आणि फुलोऱ्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने फुलोरा झाडून टाकला. तसेच आलेले धान जमिनीवर लोळत पडल्याने धान फोल होण्यासोबत त्याला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली नाही. पावसाने आठवडाभर उसंत दिल्यास हलक्या जातीच्या धानाच्या कापणीला सुरुवात होईल. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेल्या धानपिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे धान मळणीनंतर फेडरेशनच्या मार्फत शासनाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये न घालता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (लोकमत चमू)इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणार?गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले इडियाडोह धरण गेल्या दोन ३ वर्षांपासून ओव्हरफ्लो झाले नाही. गेल्यावर्षी तर हे धरण ४० टक्केही भरले नव्हते. त्यामुळे रबी हंगामात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यावर्षीसुद्धा सप्टेंबर अखेरपर्यंत हे धरण भरण्याची शाश्वती नव्हती. मात्र आॅक्टोबर महिन्यातही अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे हे धरण ९७ टक्के भरले आहे. शनिवारच्या सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हलक्या धानाचे नुकसानपांढरी : यावर्षी सर्वच शेतामधील हलके धान्य बहरलेले आहे. आठ ते दहा दिवसामध्ये धान कापणीवर येणार आहे. त्यापूर्वीच पावसाच्या फटकामुळे धान जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना धानाचा फटका बसताना दिसत आहे. पूर्वीपासूनच शेतकरी कर्जाचा बोझे घेवून कसेबसे शेतकरुन आपली उपजिविका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैसर्गिक बाबीमुळे मात घालताना दिसत आहे. शासनाने झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.