शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

परतीच्या पावसामुळे घात

By admin | Updated: October 9, 2016 00:43 IST

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना ..

धानाचे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जाणारगोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे आधी म्हटले जात होते. पण यावर्षी पोळा संपून पावसाचे दिवसही संपले असताना पावसाने पिच्छा सोडलेला नाही. आता हलका धान ऐन कापणीवर असताना काही भागात पावसाने थैमान घातल्यामुळे हाती येत असलेला धान वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सौंदड शिवारातील शेतकरी चिंतेतसौंदड : सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने हलक्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एक हजार दहा, पाटरु, आर.पी.एन., एक हजार एक या जातीच्या धानाचे आणि फुलोऱ्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने फुलोरा झाडून टाकला. तसेच आलेले धान जमिनीवर लोळत पडल्याने धान फोल होण्यासोबत त्याला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली नाही. पावसाने आठवडाभर उसंत दिल्यास हलक्या जातीच्या धानाच्या कापणीला सुरुवात होईल. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेल्या धानपिकाची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे धान मळणीनंतर फेडरेशनच्या मार्फत शासनाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये न घालता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (लोकमत चमू)इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होणार?गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेले इडियाडोह धरण गेल्या दोन ३ वर्षांपासून ओव्हरफ्लो झाले नाही. गेल्यावर्षी तर हे धरण ४० टक्केही भरले नव्हते. त्यामुळे रबी हंगामात पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यावर्षीसुद्धा सप्टेंबर अखेरपर्यंत हे धरण भरण्याची शाश्वती नव्हती. मात्र आॅक्टोबर महिन्यातही अधूनमधून पाऊस सुरूच असल्यामुळे हे धरण ९७ टक्के भरले आहे. शनिवारच्या सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर हे धरण दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हलक्या धानाचे नुकसानपांढरी : यावर्षी सर्वच शेतामधील हलके धान्य बहरलेले आहे. आठ ते दहा दिवसामध्ये धान कापणीवर येणार आहे. त्यापूर्वीच पावसाच्या फटकामुळे धान जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना धानाचा फटका बसताना दिसत आहे. पूर्वीपासूनच शेतकरी कर्जाचा बोझे घेवून कसेबसे शेतकरुन आपली उपजिविका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नैसर्गिक बाबीमुळे मात घालताना दिसत आहे. शासनाने झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.