शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

गुजरातनंतर छत्तीसगडकडे लक्ष देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:59 IST

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सरकारच्या चुकीच्या धोरणाने नाराजी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर छत्तीसगड व मध्यप्रदेशातही पक्ष विशेष लक्ष देणार असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गुजरात येथील निवडणुकीनंतर छत्तीसगढ येथे पक्ष सक्रीय होणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यासर्व गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे गुजरात येथील निवडणूक राष्टÑवादी काँग्रेस लढत असल्याने त्याचा दुसरा अर्थ लावण्याची गरज नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकार सर्वच बाबतीत फेल ठरले आहे. मागील तीन वर्षात देशाच्या निर्यातीत ६ ते ७ लाख कोटी रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्णपणे फोल ठरले आहे. महागाई, नोटबंदी, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता बेजार झाली आहे. त्यामुळे सरकारप्रती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढत आहे.सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली होती. त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरकारने एकही कौतुकासारखे काम केले नाही. या तीन वर्षांत कुठलाच बदल झाला नसून उलट बेरोजगारी आणि महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सरकारच्या धोरणाने व्यापारीवर्ग देखील त्रस्त आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत असून त्याचे परिणाम देखील आता लोकांना जाणवू लागले आहे. एकंदरीत हे सरकार सर्वच गोष्टीत फेल ठरल्याचा आरोप ना.पटेल यांनी केला.थेट सरपंच निवडीचा निर्णय अयोग्यराज्य सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होईल.अडीच वर्षे सरपंचावर अविश्वास आणता येणार नसल्याने सरपंच मनमर्जीने कारभार करेल. यामुळे गावांगावामध्ये वाद निर्माण होतील. त्यामुळे थेट सरपंच निवडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थिती त्वरित जाहीर करावीपावसाअभावी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पिकांची स्थिती गंभीर आहे. ७० टक्के पिके वाया गेली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकारने पिकांचे पंचनामे करुन जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना कराव्यात.मात्र सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने शेतकºयांची स्थिती बिकट आहे. राष्टÑवादी काँग्रेस हा मुद्दा लावून धरणार असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.वैद्यकीय महाविद्यालयाकडे देणार लक्षयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे आणि असुविधांमुळे वैद्यकीय महाविद्यालयाची तिसºया वर्षाची मान्यता धोक्यात आली आहे. याकडे काही लोकांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र मी आता याकडे लक्ष देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीणसरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना जाचक अटी लागू केल्या आहेत. कर्जमाफीवरुन सरकार दररोज नवीन अटी लागू करित आहे. त्यामुळे शेतकºयांना मार्चपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकार केवळ शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पटेल यांनी केला.