शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

गुजरातनंतर छत्तीसगडकडे लक्ष देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:59 IST

राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सरकारच्या चुकीच्या धोरणाने नाराजी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा देशात सर्वत्र विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच हेतूने गुजरात येथे निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर छत्तीसगड व मध्यप्रदेशातही पक्ष विशेष लक्ष देणार असल्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गुजरात येथील निवडणुकीनंतर छत्तीसगढ येथे पक्ष सक्रीय होणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यासर्व गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे गुजरात येथील निवडणूक राष्टÑवादी काँग्रेस लढत असल्याने त्याचा दुसरा अर्थ लावण्याची गरज नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकार सर्वच बाबतीत फेल ठरले आहे. मागील तीन वर्षात देशाच्या निर्यातीत ६ ते ७ लाख कोटी रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्णपणे फोल ठरले आहे. महागाई, नोटबंदी, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता बेजार झाली आहे. त्यामुळे सरकारप्रती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढत आहे.सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली होती. त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरकारने एकही कौतुकासारखे काम केले नाही. या तीन वर्षांत कुठलाच बदल झाला नसून उलट बेरोजगारी आणि महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सरकारच्या धोरणाने व्यापारीवर्ग देखील त्रस्त आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत असून त्याचे परिणाम देखील आता लोकांना जाणवू लागले आहे. एकंदरीत हे सरकार सर्वच गोष्टीत फेल ठरल्याचा आरोप ना.पटेल यांनी केला.थेट सरपंच निवडीचा निर्णय अयोग्यराज्य सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होईल.अडीच वर्षे सरपंचावर अविश्वास आणता येणार नसल्याने सरपंच मनमर्जीने कारभार करेल. यामुळे गावांगावामध्ये वाद निर्माण होतील. त्यामुळे थेट सरपंच निवडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थिती त्वरित जाहीर करावीपावसाअभावी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पिकांची स्थिती गंभीर आहे. ७० टक्के पिके वाया गेली आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकारने पिकांचे पंचनामे करुन जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना कराव्यात.मात्र सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने शेतकºयांची स्थिती बिकट आहे. राष्टÑवादी काँग्रेस हा मुद्दा लावून धरणार असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करुन त्वरीत उपाय योजना जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.वैद्यकीय महाविद्यालयाकडे देणार लक्षयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे आणि असुविधांमुळे वैद्यकीय महाविद्यालयाची तिसºया वर्षाची मान्यता धोक्यात आली आहे. याकडे काही लोकांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र मी आता याकडे लक्ष देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीणसरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना जाचक अटी लागू केल्या आहेत. कर्जमाफीवरुन सरकार दररोज नवीन अटी लागू करित आहे. त्यामुळे शेतकºयांना मार्चपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. सरकार केवळ शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पटेल यांनी केला.