शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तब्बल वर्षभरानंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मिळाला मुहूर्त; वर्षभरात होणार पुर्ण काम

By अंकुश गुंडावार | Updated: January 6, 2024 19:01 IST

बांधकामाला झाली सुरुवात

गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाला शनिवारपासून (दि.६) सुरुवात झाली. वर्षभरानंतर या उड्डाणपुलाच्या कामाचा प्रशासनाला मुहूर्त मिळाल्याने शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर वर्षभरात या पुलाचे बांधकाम पुर्ण केले जाणार असून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुल जीर्ण झाल्याने हा पूल वर्षांपुर्वी पाडण्यात आला होता. पण नवीन पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरु झाले नव्हते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली होती. रेलटोली परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण झाली होती. तर अंडरग्राऊंड मार्गे वाहतूक सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघातात वाढ झाली होती. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली जात होती. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासन आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी या उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. पुलाचे बांधकाम सुरु करताना आ. विनोद अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते.

वाहतुकीची कोंडी सुटणार

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जूना उड्डाणपूल पाडण्यात आला. तर नवीन उड्डाणपुलावर पादचारी मार्ग नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. त्यामुळे पुलाच्या पलिकडे राहत असलेल्या नागरिकांना शहरात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. तर जुन्या उड्डाणपुलाअभावी वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र आता पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलाचे काम लवकारत लवकर सुरु व्हावे व शहरवासीयांची अडचण दूर व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचेच फलित पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. -प्रफुल्ल पटेल, खासदार

जुना पूल पाडल्यानंतर नवीन उड्डाणपुलाचे काम लवकर सुरु करुन शहरवासीयांची अडचण दूर व्हावी, वाहतुकीची कोंडी साेडवावी यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.- विनोद अग्रवाल, आमदार

उड्डाणपुलाच्या बांधकामाला शनिवारपासून सुरुवात झाल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदार

गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलाचे कामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. आता बांधकाम सुरु झाल्याने शहवासीयांची मोठी अडचण दूर झाली आहे. - गाेपालदास अग्रवाल, माजी आमदार

टॅग्स :AirportविमानतळPraful Patelप्रफुल्ल पटेल