शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

अखेर आमसभेचा मुहूर्त निघाला

By admin | Updated: January 4, 2016 04:07 IST

वर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने

कपिल केकत ल्ल गोंदियावर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असता येत्या १२ तारखेला नगर परिषदेची आमसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमसभेसाठी चांगली लांबलचक विषयसूची तयार करण्यात आली आहे. नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी आमसभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. मात्र अध्यक्षांकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याने वर्षभरात सहा आमसभा होण्याऐवजी फक्त एकच आमसभा झाली. तर दर महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेणे बंधनकारक असताना स्थायी समितीचीही फक्त एकच सभा घेण्यात आली आहे. स्थायी समिती व आमसभा होत नसल्याने नगर परिषदेतील विकासकामे व नगर परिषद प्रशासनातील विविध कामे रखडून पडत होती. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ६० च्या जवळपास विषय मांडण्यात आले होते. यावरून आमसभा घेणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने उचलून धरला व २९ डिसेंबर रोजी ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’ या बातमीतून सर्व परिस्थिती माडली. या बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी यांनी घेतली असता स्थायी समिती व आमसभेचा मुहूर्त निघाला. येत्या ११ तारखेला स्थायी समिती व १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी वेळीच दखल घेतल्याने नगराध्यक्षांनी ही आमसभा बोलाविली, अन्यथा सभा कधी झाली असती सांगणे कठीण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पत्र ४‘लोकमत’ची बातमी बघून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना २९ तारखेलाच पत्र पाठवून ३० तारखेला दुपारी २ वाजता विषयसूची तयार करण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. मात्र नगराध्यक्षांनी लगेच विषयसूची तयार केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले व ११ तारखेला स्थायी समिती आणि १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. विषयसूचीत ३० हून अधिक विषय ४आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीत ३० हून अधिक विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठरावीक कालावधीत सभा घेण्यास कसूर केल्यास मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना कळवितात. त्यावर जिल्हाधिकारी त्यांना प्राप्त अधिकारातून सभा बोलावू शकतात व येथेही तेच होणार होते. मात्र नगराध्यक्षांनी ऐनवेळी विषयसूची तयार करून घेतली.