शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१२ व्या ग्रीन लिस्टनंतरही १८ हजार शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:36 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाचे लेटलतीफ धोरण : कर्जमाफीचे भिजत घोंगडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ६७ हजार शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. तर १८ हजार शेतकरी अद्यापही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.मागील वर्षीच्या दुष्काळाने जिल्हयातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने चांगली आर्थिक कोंडी झाली. शासनाने मागील वर्षी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी पात्र ठरले. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करुन येलो, ग्रीन, रेड अशा याद्या तयार करण्यात आल्या. ग्रीन यादी ही अंतीम असून या यादीत समावेश असलेल्या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले.जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना आत्तापर्यंत एकूण १२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या असून ६७ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी बँकाना देण्यात आला. १२ व्या यादीनंतरही जिल्ह्यातील १८ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.महाआॅनलाईनकडून बँकाना ग्रीन याद्या प्राप्त होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली. कर्जमाफीच्या घोषणेला १४ महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१३ व्या यादीकडे लक्षमहाआॅनलाईनने आत्तापर्यंत बँकांना १२ ग्रीन लिस्ट पाठविल्या असून त्यात ६७ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ग्रीन लिस्ट लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असून ही शेवटची यादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीत नेमक्या किती शेतकºयांचा समावेश असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँक आघाडीवरजिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी खातेदार हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे. या बँकेने आत्तापर्यंत ६४ हजारावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य केले आहे. राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या तुलनेत जिल्हा बँक कर्जमाफीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आघाडीवर आहे.जिल्हा बँकेला आत्तापर्यंत एकूण १३ ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून या यादीमध्ये समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. महाआॅनलाईनकडून लवकरच १३ वी ग्रीन लिस्ट प्राप्त होण्याची शक्यता आहे.सुरेश टेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक.