शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

१२ व्या ग्रीन लिस्टनंतरही १८ हजार शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:36 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाचे लेटलतीफ धोरण : कर्जमाफीचे भिजत घोंगडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ६७ हजार शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. तर १८ हजार शेतकरी अद्यापही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.मागील वर्षीच्या दुष्काळाने जिल्हयातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने चांगली आर्थिक कोंडी झाली. शासनाने मागील वर्षी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी पात्र ठरले. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करुन येलो, ग्रीन, रेड अशा याद्या तयार करण्यात आल्या. ग्रीन यादी ही अंतीम असून या यादीत समावेश असलेल्या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले.जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना आत्तापर्यंत एकूण १२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या असून ६७ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी १६० कोटी रुपयांचा निधी बँकाना देण्यात आला. १२ व्या यादीनंतरही जिल्ह्यातील १८ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.महाआॅनलाईनकडून बँकाना ग्रीन याद्या प्राप्त होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली. कर्जमाफीच्या घोषणेला १४ महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१३ व्या यादीकडे लक्षमहाआॅनलाईनने आत्तापर्यंत बँकांना १२ ग्रीन लिस्ट पाठविल्या असून त्यात ६७ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे कर्ज खाते शून्य करण्यात आले. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ग्रीन लिस्ट लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असून ही शेवटची यादी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीत नेमक्या किती शेतकºयांचा समावेश असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँक आघाडीवरजिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी खातेदार हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे. या बँकेने आत्तापर्यंत ६४ हजारावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य केले आहे. राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या तुलनेत जिल्हा बँक कर्जमाफीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आघाडीवर आहे.जिल्हा बँकेला आत्तापर्यंत एकूण १३ ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून या यादीमध्ये समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. महाआॅनलाईनकडून लवकरच १३ वी ग्रीन लिस्ट प्राप्त होण्याची शक्यता आहे.सुरेश टेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक.