शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

११ व्या यादीनंतरही २५ हजार शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:12 IST

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसाडेचार हजार शेतकऱ्यांचा समावेश : आतापर्यंत ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर नुकतीच बँकांना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४ हजार ४४६ शेतकऱ्यांची अकरावी ग्रीन यादी प्राप्त झाली आहे.यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले २५ हजार शेतकरी वेटिंंगवर आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आॅनलाईन अर्जांची पडताळणी करुन त्याची येलो, ग्रीन आणि रेड अशा याद्या तयार करुन विभागणी केली जात आहेत. ग्रीन यादी ही अंतीम यादी असून यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जात आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १५८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँका आत्तापर्यंत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण १० ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. तर मंगळवारी (दि.२३) ४४४६ शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांची ११ वी ग्रीन यादी प्राप्त झाली. तसेच या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यासाठी ११ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी सुध्दा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे.लवकरच सदर रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचे कर्ज खाते शून्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.प्रतीक्षा कायमजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकºयांपैकी आत्तापर्यंत ६३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर अजून जवळपास २५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून दोन तीन ग्रीन याद्या महाआॅनलाईनकडून येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.१४ महिन्यानंतरही प्रक्रिया सुरूचशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासन आणि महाआॅनलाईनकडून रोज नवीन नवीन निकष लावले जात असल्याचे कर्जमाफीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज