शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लरच्या तुटवड्यामुळे व्यवहार प्रभावित

By admin | Updated: December 29, 2016 01:29 IST

व्यवहारातून चिल्लर हद्दपार होत चालले आहे. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

साठेबाजी होत असल्याचा संशय : व्यावसायिकही अडचणीत केशोरी : व्यवहारातून चिल्लर हद्दपार होत चालले आहे. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदीमुळे अनेकांकडे दोन हजाराची नोट असून चिल्लर व्यवहारासाठी छोट्या नोटांची कमतरता भासत आहे. व्यवहार म्हटला की चिल्लरची गरज भासते. चार आणे, आठ आणे चलनातून हद्दपार झाले. एक रुपया, २ रुपयांसह ५ रुपये, १० रुपयांची नाणी चलनात आली; पण सध्या मार्केटमध्ये केवळ १० रुपयांची नाणी दिसत असून इतर नाणी, तसेच १० ते ५० रुपयांच्या नोटा मात्र बेपत्ता झाल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किराणा व्यावसायिक, औषधी विक्रेते यांची गोची होते. त्यांना एक-दोन रुपये करता-करता दिवसाला ५० रुपयांवर नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एक-दोन रुपयांत मिळणारी औषधीच ते विकत नसल्याचे दिसते. बाजारपेठेतील मोठे व्यापारी ही चिल्लर छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप केला जात आहे. सुट्या पैशांअभावी अनेकांना वस्तू खरेदीपासून मुकावे लागते. व्यवहार करताना अडचण निर्माण होतात. रिझर्व्ह बॅँकेकडून सुट्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असतानाही सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे सुटे पैसे जातात तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. काही व्यापारी या सुट्या नाण्यांचाही काळाबाजार करीत असल्याचे एका लहान व्यावसायिकाने सांगितले. १०० रुपयांना ९० रुपये, असा सुट्या नाण्यांचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे छोट्या नोटा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)