शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चिल्लरच्या तुटवड्यामुळे व्यवहार प्रभावित

By admin | Updated: December 29, 2016 01:29 IST

व्यवहारातून चिल्लर हद्दपार होत चालले आहे. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

साठेबाजी होत असल्याचा संशय : व्यावसायिकही अडचणीत केशोरी : व्यवहारातून चिल्लर हद्दपार होत चालले आहे. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदीमुळे अनेकांकडे दोन हजाराची नोट असून चिल्लर व्यवहारासाठी छोट्या नोटांची कमतरता भासत आहे. व्यवहार म्हटला की चिल्लरची गरज भासते. चार आणे, आठ आणे चलनातून हद्दपार झाले. एक रुपया, २ रुपयांसह ५ रुपये, १० रुपयांची नाणी चलनात आली; पण सध्या मार्केटमध्ये केवळ १० रुपयांची नाणी दिसत असून इतर नाणी, तसेच १० ते ५० रुपयांच्या नोटा मात्र बेपत्ता झाल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किराणा व्यावसायिक, औषधी विक्रेते यांची गोची होते. त्यांना एक-दोन रुपये करता-करता दिवसाला ५० रुपयांवर नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एक-दोन रुपयांत मिळणारी औषधीच ते विकत नसल्याचे दिसते. बाजारपेठेतील मोठे व्यापारी ही चिल्लर छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप केला जात आहे. सुट्या पैशांअभावी अनेकांना वस्तू खरेदीपासून मुकावे लागते. व्यवहार करताना अडचण निर्माण होतात. रिझर्व्ह बॅँकेकडून सुट्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असतानाही सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे सुटे पैसे जातात तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. काही व्यापारी या सुट्या नाण्यांचाही काळाबाजार करीत असल्याचे एका लहान व्यावसायिकाने सांगितले. १०० रुपयांना ९० रुपये, असा सुट्या नाण्यांचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे छोट्या नोटा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)