शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

पीक बदल करुन शेतीपूरक व्यवसायाची कास धरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या ...

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणावर शेती अवलंबून आहे. यातच वेळी-अवेळी निसर्गाचा कोप बरसतो. खतांच्या वाढत्या किंमती, उत्पादीत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगाची कमतरता या बाबी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती होण्यास आड येत असल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल करुन प्रक्रिया उद्योगाबरोबरच शेतीपुरक व्यवसायाची कास धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्यावतीने घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध योजनेबाबत शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, प्रा.ढोके, नागभिडे, तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष रतीराम राणे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार उपस्थित होते. सुसंवाद कार्यक़्रमात तालुका सल्लागार समितीचे शेतकरी तसेच तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांच्याशी चर्चा करुन बोंडगावदेवी येथे बांबु समुह, गोठणगाव येथे मका, केशोरी येथे मिरची, इटखेडा येथे मत्स्यपालन समुह तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. आमदारांनी सुचविलेल्या समुहाला कार्यान्वीत करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा विभाग कटिबध्द असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. निवड झालेल्या समुहातील शेतकऱ्यांच्या प्राथमिक सभा घेऊन माहिती संकलन करणे, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजीत करणे, पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करुन निवडलेले समूह पूर्णत्वास नेण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी मानले.