शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीक बदल करुन शेतीपूरक व्यवसायाची कास धरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या ...

बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणावर शेती अवलंबून आहे. यातच वेळी-अवेळी निसर्गाचा कोप बरसतो. खतांच्या वाढत्या किंमती, उत्पादीत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगाची कमतरता या बाबी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती होण्यास आड येत असल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल करुन प्रक्रिया उद्योगाबरोबरच शेतीपुरक व्यवसायाची कास धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्यावतीने घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध योजनेबाबत शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, प्रा.ढोके, नागभिडे, तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष रतीराम राणे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार उपस्थित होते. सुसंवाद कार्यक़्रमात तालुका सल्लागार समितीचे शेतकरी तसेच तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांच्याशी चर्चा करुन बोंडगावदेवी येथे बांबु समुह, गोठणगाव येथे मका, केशोरी येथे मिरची, इटखेडा येथे मत्स्यपालन समुह तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. आमदारांनी सुचविलेल्या समुहाला कार्यान्वीत करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा विभाग कटिबध्द असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. निवड झालेल्या समुहातील शेतकऱ्यांच्या प्राथमिक सभा घेऊन माहिती संकलन करणे, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजीत करणे, पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करुन निवडलेले समूह पूर्णत्वास नेण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी मानले.