शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संगनमताने

By admin | Updated: November 26, 2014 23:07 IST

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारण करताना बालहक्क शिक्षण कायद्यातील नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. यातून जिल्ह्यात

कार्यशाळा घेतलीच नाही : शिक्षणाधिकारी कार्यालयाचा असाही प्रतापकेशोरी : सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारण करताना बालहक्क शिक्षण कायद्यातील नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. यातून जिल्ह्यात अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रियाही चुकीच्या पद्धतीने अंमलात आणल्या जात आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारणासाठी दिलेल्या बालहक्क शिक्षण कायद्यातील तरतुदींची शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने पायमल्ली केली. जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करताना कार्यशाळेचे आयोजन करून कोणत्या शाळेत कोणत्या विषयाच्या शिक्षकांची गरज आहे, किंवा ज्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्या शाळेच्या संस्थेअंतर्गत एकापेक्षा अधिक शाळा सुरू असतील तर पहिल्यांदा संस्थेअंतर्गत समायोजन प्रक्रिया आटोपावी, असे नियम आहेत. असे असताना यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या यादीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्याच संगनमताने करून भोंगळ कारभाराची प्रचिती दिली आहे. ज्या ठिकाणी विषय माध्यम शिकविण्याची गरज आहे त्या विषयाच्या शिक्षकांचे समायोजन न करता दुसऱ्याच विषयाच्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. समायोजन करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोणातूनच कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्यक होते. परंतु असे न करता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आदेश काढल्याने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची असली तरी त्यांना ज्या शाळेत समायोजन करावयाचे आहे त्या ठिकाणी कोणत्या विषय शिक्षकांची कोणत्या माध्यमातून विषय शिकविण्यासाठी गरज आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषयाप्रती उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे हे पडताळून त्यानुसार समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतू तसे न करता संबंधित शिक्षकांच्या संगनमताने त्यांनी ज्या ठिकाणची मागणी केली त्या ठिकाणी त्यांना समायोजन करून एक प्रकारे बालहक्क शिक्षण कायद्यातील तरतुदींची पायमल्ली करण्यात आली, असा आरोप काही मुख्याध्यापकांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर कोणताही निर्णय अद्याप लागलेला नाही. असे असताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी समायोजनाची प्रक्रिया सुरु करून न्यायालयाचा अवमान केल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. (वार्ताहर)