शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संगनमताने

By admin | Updated: November 26, 2014 23:07 IST

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारण करताना बालहक्क शिक्षण कायद्यातील नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. यातून जिल्ह्यात

कार्यशाळा घेतलीच नाही : शिक्षणाधिकारी कार्यालयाचा असाही प्रतापकेशोरी : सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारण करताना बालहक्क शिक्षण कायद्यातील नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. यातून जिल्ह्यात अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रियाही चुकीच्या पद्धतीने अंमलात आणल्या जात आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात खासगी माध्यमिक शाळांतील तुकड्या व संच निर्धारणासाठी दिलेल्या बालहक्क शिक्षण कायद्यातील तरतुदींची शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने पायमल्ली केली. जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करताना कार्यशाळेचे आयोजन करून कोणत्या शाळेत कोणत्या विषयाच्या शिक्षकांची गरज आहे, किंवा ज्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्या शाळेच्या संस्थेअंतर्गत एकापेक्षा अधिक शाळा सुरू असतील तर पहिल्यांदा संस्थेअंतर्गत समायोजन प्रक्रिया आटोपावी, असे नियम आहेत. असे असताना यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या यादीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्याच संगनमताने करून भोंगळ कारभाराची प्रचिती दिली आहे. ज्या ठिकाणी विषय माध्यम शिकविण्याची गरज आहे त्या विषयाच्या शिक्षकांचे समायोजन न करता दुसऱ्याच विषयाच्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. समायोजन करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोणातूनच कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्यक होते. परंतु असे न करता अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आदेश काढल्याने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची असली तरी त्यांना ज्या शाळेत समायोजन करावयाचे आहे त्या ठिकाणी कोणत्या विषय शिक्षकांची कोणत्या माध्यमातून विषय शिकविण्यासाठी गरज आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषयाप्रती उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे हे पडताळून त्यानुसार समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतू तसे न करता संबंधित शिक्षकांच्या संगनमताने त्यांनी ज्या ठिकाणची मागणी केली त्या ठिकाणी त्यांना समायोजन करून एक प्रकारे बालहक्क शिक्षण कायद्यातील तरतुदींची पायमल्ली करण्यात आली, असा आरोप काही मुख्याध्यापकांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर कोणताही निर्णय अद्याप लागलेला नाही. असे असताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी समायोजनाची प्रक्रिया सुरु करून न्यायालयाचा अवमान केल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. (वार्ताहर)