शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात व्यवस्था वाऱ्यावर

By admin | Updated: May 21, 2016 01:48 IST

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा प्रशासनाची पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याकरिता काढण्यात आला.

मस्के यांचा आरोप : वसतिगृहाच्या गृहपालाने दिली अपूर्ण माहितीदेवरी : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा प्रशासनाची पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याकरिता काढण्यात आला. नागरिकांना माहिती मिळविण्याच्या अधिकाराची व्यवहार्य पद्धती आखून देण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. तर शासन यंत्रणा उदासीन असून माहिती देण्यास अर्जदाराची दिशाभूल व टाळाटाळ करण्याचे काम शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल (जुने) यांच्याकडून करण्यात आल्याचे दिसून येते.सविस्तर असे की, आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र मस्के यांनी शासन निर्णय संबंधीच्या एकूण सात मुद्यांची सन ११ नोव्हेंबर २०११ च्या परिशिष्ट अ, ब, क ची माहिती मिळण्याबाबत या शासन निर्णय संबंधीच्या एकूण सात मुद्यांची सन २०१३ ते १५ या कालावधीची माहिती मिळण्यासंबंधीचा अर्ज २ जानेवारी रोजी केला होता. मागितलेल्या माहितीमध्ये एकापेक्षा अधिक मुद्दे असल्याने प्रत्येक मुद्यासंबंधी स्वतंत्र अर्ज करण्यासंबंधी गृहपाल यांनी सूचविले होते. यावर अर्जदाराचे समाधान न झाल्यामुळे ६ फेब्रुवारी रोजी येथील प्रकल्प अधिकारी/एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे प्रथम अपिल सादर केली.सदर अपिलाची सुनावणी २१ मार्च ठेवण्यात आली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार अपिलार्थी यांना त्यांना अर्जानुसार मागविण्यात आलेली माहिती २० मार्चपर्यंत पुरविण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी मीनाक्षी उन्हाळे यांनी दिले. मात्र २२ एप्रिल रोजी मस्के यांना माहिती मिळाली, ती माहिती अपूर्ण असून शासन निर्णयाची दिशाभूल करणारी आहे. मुद्देनिहाय मागितलेल्या माहितीत स्वच्छता प्रसाधनाकरिता अतिरिक्त खर्चाची खुंटलेली माहिती त्यांनी दिली नाही. शासन निर्णयानुसार दर महा प्रतिविद्यार्थिनी १०० रुपयांची तरतूद केलेली आहे. शिवाय स्रेहसंमेलनाचा अहवाल व देयके त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. शासन निर्णयानुसार, प्रति शासकीय वसतिगृह २५ हजार रूपयांची तरतूद केलेली आहे. छत्री, रेनकोट, गमबूट यांच्या नोंदी असलेल्या वह्यांच्या प्रतिसुद्धा मिळालेल्या नाहीत. शासन निर्णयानुसार ५०० रुपयांची तरतूद केलेली आहे. क्रीडा साहित्यांची खरेदी प्रक्रिया नाही. वह्या व स्टेशनरी यांच्या खरेदी प्रक्रियेसंबंधी दस्तावेजाची माहिती दिली नाही. त्यांच्याकडे एकूण संगणकांची संख्या तीन व प्रिंटरची संख्या एक आहे. सदर साहित्याचे देयके प्रकल्प कार्यालय देवरी यांनी काढल्याचे समजते. शासन निर्णयानुसार शासकीय वसतिगृहामध्ये १० विद्यार्थिनींसाठी एक संगणक इंटरनेट सुविधेसह उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. संगणक शिक्षक व रोजंदारी कर्मचारी यांची देयके उपलब्ध करुन दिलेली नाही. आजारी मुलांची नोंदवही व जडवस्तू संग्रह नोंद वही, आहार नोंदवही, भोजन व चव नोंदवही, विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी नोंदवही देण्याचे टाळले.प्राप्त माहितीवरुन असे दिसून येते की, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात (जुने) व विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. सदर शासन निर्णय विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता काढण्यात आलेला होता. यात वरिष्ठ कार्यालयीन अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे निष्पन्न होते. सदर प्रकरणामध्ये अपिलकरिता प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांनी आदेशामध्ये कुठलेही लेखी कारण नमूद न करता अपीलसाठी ४५ दिवस घेतले. यावरुन माहितीच्या अधिकार संबंधाने प्रशासकीय यंत्रणा किती कर्तव्यदक्ष आहे, हे दिसून येते. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अर्जदाराला परिपूर्ण माहिती मिळाली नाही. अर्जदाराला नाहक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सदर प्रकरणात न्यायासाठी द्वितीय अपीलकरिता अर्ज राज्य माहिती आयोग नागपूर यांना करुन स्थानिक आ. संजय पुराम व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना प्रकरणाची गंभीरता लक्षात आणून देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा मानस भूपेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)भ्रष्टाचाराचे गालबोटभूपेंद्र मस्के यांनी मागितलेल्या माहितीच्या आधारावर संबंधित प्रकरणात भ्रष्टाचार असल्याचे निष्पन्न होते. दोषी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करुन पदमुक्त करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते प्रदीप राऊत यांनी केले आहे.