शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

खोटे व खोडतोड केलेले बिल जोडून लाखो रुपयांची उचल

By admin | Updated: January 19, 2016 02:51 IST

तालुक्यातील जमुनिया व काचेवानी या दोन्ही गावांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी खोटे व खोडतोड

तिरोडा : तालुक्यातील जमुनिया व काचेवानी या दोन्ही गावांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी खोटे व खोडतोड केलेल्या बिलांची फाईलला जोडणी करून लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सरपंच, ग्रा.पं.सदस्यांनी केली. मात्र त्या तक्रारीचा अहवाल मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडूनही गोलमाल आणि उडवा-उडवीचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणखीच बळावत आहे.आठ दिवसात अहवाल सादर करतो, असे उत्तरे मागील अनेक दिवसांपासून दिले जात आहेत. तत्कालीन पं.स.सदस्य रमेशकुमार पटले यांनीसुध्दा पं.स.च्या सभेत हा मुद्दा लावून धरला होता. तत्कालीन बीडीओ जमईवार यांनीसुध्दा याबाबत टाळाटाळ केली. त्यांची बदली झाली, पं.स.विस्तार अधिकारी यांचीही बदली या काळात होऊन गेली. नवीन बीडीओ मानकर आलेत. विस्तार अधिकारी निमजे यांचेकडे चार्ज देण्यात आला. परंतु आजपर्यंत चौकशी अहवाल पंचायत समितीला सादर करू शकले नाही. याबाबत पं.स.ला काही ग्रा.पं.सदस्यांनी माहितीचा अधिकार लावून माहिती मागविली. परंतू त्यांनासुध्दा या अहवाल अजूनपर्यंत मिळालेला नाही. आता नवीन पं.स.सभापती, उपसभापती व सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. शुक्रवारला बीडीओ व पंचायत विस्तार अधिकारी यांना सभापतीच्या चेंबरमध्ये बोलवून उपसभापती व सदस्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. ग्राम पंचायत जमुनिया येथे ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी लाखो रुपयांची खोटी व खोडतोड केलेली बिले जोडल्याचा आरोप केला जात आहे. पाणीपट्टी फंड, तंटामुक्ती अनुदान, पर्यावरण ग्रा.स.योजना, सामान्य फंड, १३ वा वित्त आयोग अशा विविध शिर्षकाखाली खोट्या व खोडतोड केलेल्या बिलांची जोडणी केली व लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. सत्र २०१२-२०१३ ते सत्र २०१४-१५ या काळात हा अपहार झाल्याचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)बीडीओंचे नियंत्रण नाही४पंचायत समितीची मासिक सभा दि. १६ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबंधित विभागाचे अधिकारी हजर राहात नसल्याने ही सभा वारंवार तहकुब केली जात आहे. मागील अनेक सभेच्या माध्यमातून असे लक्षात येते की, एकूण १६ विभागांपैकी केवळ ८-१० विभागातील कर्मचारी-अधिकारी उपस्थित असतात. बाकी अनुपस्थित राहतात. कारण त्यांच्यावर बीडीओंचे नियंत्रण नाही, असा आरोप उपसभापती किशोर पारधी यांनी केला. ४यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शंकेचे वातावरण पसरले असून यावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा केली जात आहे.