तिरोडा : कुठल्याही पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्तेच असतात. काँग्रेस पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता पक्ष बळकटीकरणावर भर द्या, असे मार्गदर्शन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले. तालुका काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष जितेश राणे, तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, दलित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पवन मोरे, रमेश पटले, डॉ. गिरधर बिसेन, शोभेलाल दहीकर, शहराध्यक्ष ठमेंद्रसिंह चव्हाण, लक्ष्मीनारायण दुबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूनम रहांगडाले, युवक अध्यक्ष ओम पटले, भूमेश्वर पारधी, माणिक झंझाड, सलाभाई शेख, प्रवीण शेंडे, संजय किंदरले, निमरुद पटले, नरेश जुनेवार, धनराज पटले, गोविंद ठाकरे, लेखराज हिरापुरे, मुकेश बरियेकर, शिवा यादव, धीरज बरियेकर, संजय खियानी, हितेंद्र जांभुळकर, राजू चामट उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षण तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.
कार्यकर्त्यांनो, पक्ष बळकटीकरणावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST