शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मारहाण करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना गांभिर्याने घेऊन मारहाण करणाºयांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या ...

ठळक मुद्देमहावितरणचा पुढाकार : वीज चोरीच्या आरोपींना अटक, कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना गांभिर्याने घेऊन मारहाण करणाºयांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरण कर्मचारी उन्ह, वारा व पावसात ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाºयांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो, ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते, अशांसाठी भादंविच्या कलम ३५३ कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.वीज कर्मचाºयांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा मोफत वापरण्यासाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत आहेत. त्यामुळे महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करणे अशक्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाºयांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे, हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांनी काम तरी कसे करावे, असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहे. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे, हे प्रकार अलीकडच्या काळात जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र वाढले आहेत. संबंधितांविरूद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.शिक्षा व दंडाची तरतूदवीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºयांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यं कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षांपर्यत कैद आणि दंडाची तरतूद असून कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकीत हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.