शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

चराईला गेलेली ३६ जनावरे ताब्यात

By admin | Updated: August 4, 2016 00:12 IST

नवेगावबांध-नागझिरा राखीव क्षेत्रातील वन्यजीव सहवनक्षेत्र कोसबी अंतर्गत वनात अवैध चराई करणाऱ्या ३६ जनावरांना पकडण्यात आले.

तिघांवर कारवाई : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील प्रकरण सडक अर्जुनी : नवेगावबांध-नागझिरा राखीव क्षेत्रातील वन्यजीव सहवनक्षेत्र कोसबी अंतर्गत वनात अवैध चराई करणाऱ्या ३६ जनावरांना पकडण्यात आले. तसेच तीन इसमांवर सोमवार (दि.१) ला कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, कोसबी सहवनक्षेत्राला लागून असलेल्या बकी गावाजवळ असलेल्या बिट क्रमांक २०२ मधील गवत कुरणात बकीमधील राजकुमार चुटे, विकेश मसराम, मारोती वाढई यांच्या १६ म्हशी, सहा वघार, सहा बैल, ३ गाई, दोन वासरू २, नऊ शेळ्या अशा एकूण ३६ जनावरांना पकडून वन्यजीव विभागाने आपल्या ताब्यात घेतले. गावठी जनावरांची रोगाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये व गावठी प्राण्यांना जंगलात जाण्यास मनाई असतानासुद्धा सदर नागरिकांनी व्याघ्र प्रकल्पात नेवून चराई केल्याने वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम २७ (१), ३५ (६), २९, ३५ (७), ३९ (३), ४०, ५१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार त्या इसमांना जामिनीवर सोडण्यात आले. पकडलेले ३६ जनावरे आजही वन्यजीव विभागाच्या कोसबी कार्यालय परिसरात वन कर्मचारीच्या देखरेखीत ठेवले आहेत. रात्रीच्या वेळी ८ वनमजूर व ३ वनरक्षकांची पाळी लावली जात आहे. या ३६ जनावरांमुळे एक लाख १० हजार रुपयांचे वनांचे नुकसान झाल्याची माहिती वनक्षेत्र सहायक एस.व्ही. भदाने यांनी दिली. या वेळी वनरक्षक पी.एन. जोशी, अमर रंगारी, राजेश सूर्यवंशी, लक्ष्मण चोले, आनंद गबाले, माधव मुसळे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)