शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

खातीटोल्यातील नळ योजना कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

गोंदिया : तालुक्यातील ग्राम खातीटोला येथे १३ वर्षांपूर्वी ३ लाख १५ हजार रूपये खर्चून नळयोजना तयार करण्यात आली. मात्र ...

गोंदिया : तालुक्यातील ग्राम खातीटोला येथे १३ वर्षांपूर्वी ३ लाख १५ हजार रूपये खर्चून नळयोजना तयार करण्यात आली. मात्र या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अद्याप थेंबभर पाणी मिळाले नसल्याने ग्रामस्थांसाठी ही नळयोजना केवळ दीपास्वप्न ठरली आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेला असून नागरिकांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

खातीटोला गावची लोकसंख्या ७५० असून सन २००६-२००७ मध्ये जिल्हा परिषदेने ३ लाख १५ हजार रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ही योजना तत्कालीन सरपंचाच्या प्रयत्नातून मंजूर झाली होती. त्याकरिता त्यांनी वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. या योजनेंतर्गत खातीटोला (झालूटोला) येथे १५ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली. आता गावात नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक अद्याप त्या टाकीत पाण्याचा एक थेंब देखील गेला नाही. योजना पूर्णत्वास आली तेव्हापासून ही टाकी कोरडीच आहे. यामुळे नागरिकांच्या अपेक्षांवर विरजण पडले. परिणामी आता नागरिकांना हातपंप आणि विहिरींच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते आहे. सध्या हातपंप देखील कोरडे पडल्याने गावात पाणीटंचाई आहे. शासनाचा निधी वाया गेल्यामुळे नागरिकांत असंतोष आहे. तातडीने ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणून नळद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.