शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समित्यांकडून होतोय अधिकाराचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 01:53 IST

राज्य शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व शाळा विकासांकरीता गतीशील कार्य व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची रचना केली.

शिक्षकांना मागतात पार्ट्या : चमचेगिरी करणाऱ्या शिक्षकांना अभयआमगाव : राज्य शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व शाळा विकासांकरीता गतीशील कार्य व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची रचना केली. परंतु याच व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळांमधून राजकारणी ध्येयाला समोर होत आहेत. शिक्षकांना धारेवर धरून स्वत:चा स्वार्थ साधण्याकरीता पाहुणचाराचे बळी ठरवत असताना दिसतात. त्यामुळे शैक्षणिक धोरणात या व्यवस्थापन समिती धोक्याची घंटा वाजवत आहे. शासनाने शाळा विकास व विद्यार्थ्यांच्या कुशल अध्यापनात प्रगतीशील वाढ व्हावी या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची बांधणी केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे या दृष्टीने अनेक उपाययोजना शासनाने पुढे केले आहे. यात खाजगी शाळांमधील शाळा व्यवस्थापन समिती विकासात्मक बदल घडवत आहेत. परंतु जिल्हा परिषद शाळांमधील व्यवस्थापन समिती मात्र राजकारणापलिकडे निघाल्याची दृष्य समोर आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वत:चे राजकारणी ध्येय साध्य करण्याकरीता अनेक व्यक्ती या व्यवस्थापनात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापन समितीच्या माध्यमाने शाळांमधील संपूर्ण व्यवस्थापकीय कारभार मिळावे यासाठी समितीमधील सदस्य मुख्याध्यापक, शिक्षकांच्या अध्यापन कार्यात ढवळाढवळ करतांना दिसतात. सदर व्यवस्थापनात महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना अध्यापन गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करून धारेवर धरण्यात येत आहे. शाळा अध्यापनाचे कार्य सुरू असतांना विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रवेश करून शैक्षणिक कार्यात हस्तक्षेप करतांनाची नवीन बाब नाही. पोषण आहार, शाळा विकास निधी यामधून स्वत:च्या हिस्से मागतात. त्यामुळे शाळा विकास व शैक्षणिक गुणवत्ता पणाला लागली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील व्यवस्थापन समितीतील सदस्य शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करून त्यांना धारेवर धरतात. शैक्षणिक गुणवत्ता संदर्भातील हस्तक्षेप करून त्यांना पाहुणचाराची मागणीही या समित्यातील अध्यक्ष व सदस्य करतात. काही शिक्षकांना हाताशी धरून पाहुणचाराचा खेळ मात्र शैक्षणिक धोरणात धोक्याची घंटा वाजवित आहे. त्यामुळे या व्यवस्थापन समिती शासनाने रद्द करावी तर व्यवस्थापनाचे सूत्र गुणवत्तेप्रमाणे उच्च शिक्षितांकडे देण्याची मागणी होेत आहे. (शहर प्रतिनिधी)