शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

व्याघ्र प्रकल्पात मुबलक पाणी

By admin | Updated: April 9, 2017 00:10 IST

उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते.

सौर उर्जा पंप ठरले वरदान : वन्यप्राण्यांची गावाकडील धाव टळली ेसडक अर्जुनी : उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते. यंदा मात्र वन्यप्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून त्यांची गावाकडील धाव टळली आहे. कारण नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने सौर उर्जा पंप लावले असून त्यामुळे जंगलात मुबलक पाणी झाले आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात नवेगावबांध, डोंगरगाव/डेपो व बोंडे या तीन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याच वनपरिक्षेत्रात खोबा-१, घोडादेव, रांझीचा टोक या ठिकाणीही सौर ऊर्जा पंप प्रस्तावित आहेत. डोंगरगाव (डेपो) वनपरिक्षेत्रात क्र.नं. ५७४ मध्ये कृत्रिम पाणवठा आहे. तर सौर ऊर्जेवर चालणारे चार पंप बसविले आहेत. त्यात शेरपार-१, डोंगरगाव, कन्हाळगाव, खडकी या ठिकाणी तयार केले आहेत. नवीन प्रस्तावित म्हणून घाटकुही येथे तयार होणार आहे. तर पिंडकेपार, भसबोळण, मोठाघाट, लालझरी, कोटजांभोरा येथे प्रस्तावीत आहेत. बोंडे व डोंगरगाव/डेपो हे वनपरिक्षेत्र १२२.७६ चौरस किलोमिटरमध्ये विस्तीर्ण आहे. तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान १२९.५५ चौरस किलोमीटरमध्ये आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातून जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांचा खोलीकरणाचे काम होणार आहे. या खोलीकरणामुळे जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांना भरपूर पाणी उपलब्ध होईल. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात तिन्ही वनपरिक्षेत्रात १५ सौर ऊर्जा पंप बसविल्याने पाण्याची सोय झाली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जंगलात प्राण्यांना पाण्याची समस्या सुटली आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे पंप २४ तास पाणी बाहेर टाकत असतात. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. त्या पाणवठ्यात भरपूर पाणी राहत असल्यामुळे प्राणी इतरत्र भटकताना दिसत नाही. पाणवठे हे बशीच्या आकाराचे असल्यामुळे प्राणी पाण्यात पडल्याची भिती मुळीच नाही. जंगलातील वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, रानडुक्कर, रोही, ससे, सांबर आदी सरपटणारे प्राणी या पाणवठ्यांचा उपयोग घेतात. नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पास बहुतेक ठिकाणी लहान मोठे तलाव आहेत. त्या तलावात पाणी आजही भरले आहे. कोसबी सहवनक्षेत्रात येत असलेल्या झनकारगोंदी तलावात भरपूर पाणी असल्याने प्राणी त्याच परिसरात राहणे जास्त पसंद करतात. जंगलातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे प्राण्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा मिळाली आहे. सौर ऊर्जा बसविण्यासाठी ३ लाख ५० हजारांचा निधी खर्च होत आहे. शासनाची हि योजना वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)