शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

व्याघ्र प्रकल्पात मुबलक पाणी

By admin | Updated: April 9, 2017 00:10 IST

उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते.

सौर उर्जा पंप ठरले वरदान : वन्यप्राण्यांची गावाकडील धाव टळली ेसडक अर्जुनी : उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते. यंदा मात्र वन्यप्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून त्यांची गावाकडील धाव टळली आहे. कारण नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने सौर उर्जा पंप लावले असून त्यामुळे जंगलात मुबलक पाणी झाले आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात नवेगावबांध, डोंगरगाव/डेपो व बोंडे या तीन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याच वनपरिक्षेत्रात खोबा-१, घोडादेव, रांझीचा टोक या ठिकाणीही सौर ऊर्जा पंप प्रस्तावित आहेत. डोंगरगाव (डेपो) वनपरिक्षेत्रात क्र.नं. ५७४ मध्ये कृत्रिम पाणवठा आहे. तर सौर ऊर्जेवर चालणारे चार पंप बसविले आहेत. त्यात शेरपार-१, डोंगरगाव, कन्हाळगाव, खडकी या ठिकाणी तयार केले आहेत. नवीन प्रस्तावित म्हणून घाटकुही येथे तयार होणार आहे. तर पिंडकेपार, भसबोळण, मोठाघाट, लालझरी, कोटजांभोरा येथे प्रस्तावीत आहेत. बोंडे व डोंगरगाव/डेपो हे वनपरिक्षेत्र १२२.७६ चौरस किलोमिटरमध्ये विस्तीर्ण आहे. तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान १२९.५५ चौरस किलोमीटरमध्ये आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातून जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांचा खोलीकरणाचे काम होणार आहे. या खोलीकरणामुळे जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांना भरपूर पाणी उपलब्ध होईल. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात तिन्ही वनपरिक्षेत्रात १५ सौर ऊर्जा पंप बसविल्याने पाण्याची सोय झाली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जंगलात प्राण्यांना पाण्याची समस्या सुटली आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे पंप २४ तास पाणी बाहेर टाकत असतात. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. त्या पाणवठ्यात भरपूर पाणी राहत असल्यामुळे प्राणी इतरत्र भटकताना दिसत नाही. पाणवठे हे बशीच्या आकाराचे असल्यामुळे प्राणी पाण्यात पडल्याची भिती मुळीच नाही. जंगलातील वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, रानडुक्कर, रोही, ससे, सांबर आदी सरपटणारे प्राणी या पाणवठ्यांचा उपयोग घेतात. नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पास बहुतेक ठिकाणी लहान मोठे तलाव आहेत. त्या तलावात पाणी आजही भरले आहे. कोसबी सहवनक्षेत्रात येत असलेल्या झनकारगोंदी तलावात भरपूर पाणी असल्याने प्राणी त्याच परिसरात राहणे जास्त पसंद करतात. जंगलातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे प्राण्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा मिळाली आहे. सौर ऊर्जा बसविण्यासाठी ३ लाख ५० हजारांचा निधी खर्च होत आहे. शासनाची हि योजना वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)