शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

व्याघ्र प्रकल्पात मुबलक पाणी

By admin | Updated: April 9, 2017 00:10 IST

उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते.

सौर उर्जा पंप ठरले वरदान : वन्यप्राण्यांची गावाकडील धाव टळली ेसडक अर्जुनी : उन्हाळ््यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटून वन्यप्राण्यांना गावाकडे धाव घ्यावी लागते व यात त्यांची शिकार होते. यंदा मात्र वन्यप्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून त्यांची गावाकडील धाव टळली आहे. कारण नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने सौर उर्जा पंप लावले असून त्यामुळे जंगलात मुबलक पाणी झाले आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात नवेगावबांध, डोंगरगाव/डेपो व बोंडे या तीन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याच वनपरिक्षेत्रात खोबा-१, घोडादेव, रांझीचा टोक या ठिकाणीही सौर ऊर्जा पंप प्रस्तावित आहेत. डोंगरगाव (डेपो) वनपरिक्षेत्रात क्र.नं. ५७४ मध्ये कृत्रिम पाणवठा आहे. तर सौर ऊर्जेवर चालणारे चार पंप बसविले आहेत. त्यात शेरपार-१, डोंगरगाव, कन्हाळगाव, खडकी या ठिकाणी तयार केले आहेत. नवीन प्रस्तावित म्हणून घाटकुही येथे तयार होणार आहे. तर पिंडकेपार, भसबोळण, मोठाघाट, लालझरी, कोटजांभोरा येथे प्रस्तावीत आहेत. बोंडे व डोंगरगाव/डेपो हे वनपरिक्षेत्र १२२.७६ चौरस किलोमिटरमध्ये विस्तीर्ण आहे. तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान १२९.५५ चौरस किलोमीटरमध्ये आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातून जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांचा खोलीकरणाचे काम होणार आहे. या खोलीकरणामुळे जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांना भरपूर पाणी उपलब्ध होईल. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात तिन्ही वनपरिक्षेत्रात १५ सौर ऊर्जा पंप बसविल्याने पाण्याची सोय झाली आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जंगलात प्राण्यांना पाण्याची समस्या सुटली आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे पंप २४ तास पाणी बाहेर टाकत असतात. जंगलात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. त्या पाणवठ्यात भरपूर पाणी राहत असल्यामुळे प्राणी इतरत्र भटकताना दिसत नाही. पाणवठे हे बशीच्या आकाराचे असल्यामुळे प्राणी पाण्यात पडल्याची भिती मुळीच नाही. जंगलातील वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, रानडुक्कर, रोही, ससे, सांबर आदी सरपटणारे प्राणी या पाणवठ्यांचा उपयोग घेतात. नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पास बहुतेक ठिकाणी लहान मोठे तलाव आहेत. त्या तलावात पाणी आजही भरले आहे. कोसबी सहवनक्षेत्रात येत असलेल्या झनकारगोंदी तलावात भरपूर पाणी असल्याने प्राणी त्याच परिसरात राहणे जास्त पसंद करतात. जंगलातील गावांचे पुनर्वसन केल्यामुळे प्राण्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा मिळाली आहे. सौर ऊर्जा बसविण्यासाठी ३ लाख ५० हजारांचा निधी खर्च होत आहे. शासनाची हि योजना वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)