शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

अनुपस्थितीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास ...

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास घरात मृतदेह ठेवावा लागला. अखेर त्या बाधित मृतदेहाची रात्री १२ वाजल्यानंतर विल्हेवाट लावावी लागली. हा संतापजनक प्रकार येथील सिग्नलटोली येथे रविवारी (दि. ११) रात्री घडला. शासन कोरोनाप्रती कितीही अलर्ट असले तरी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कशी हेळसांड होते याचा उत्तम नमुना बघावयास मिळाला. या प्रकारामुळे नगरपंचायतप्रती मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिग्नलटोली येथील इसम (५६) हे गुरुवारी (दि. ८) बाधित आढळून आले होते. त्यावेळी कोविड केअर सेंटरची व्यवस्था नसल्याने गृह विलगीकरणात होते. त्यांना आधीच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ते शेळ्या चारण्यासाठी गेले होते. रात्री ७ वाजता श्वसनाचा त्रास होऊ लागला. आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, रात्री ८.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. नोडल अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला कळविले. तातडीने तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मृताच्या घरी भेट दिली. मात्र, नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी कुणीही पोहोचले नाही. यात तब्बल ३ तास लोटले. अखेर रात्री ११.३० वाजता नगरपंचायतचे कर्मचारी मृताच्या घरी ट्रॅक्टर घेऊन दाखल झाले. रात्री १२ वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विलंब होत असल्याने काही काळ शेजाऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. तहसीलदार, नोडल अधिकारी, पोलीस कर्मचारी, तलाठी, आरोग्य कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. आरोग्य विभागाने सोमवारी एक पथक पाठवून परिसरात चाचण्या केल्या.

-------------------

मी रजेवर ----- मुख्याधिकारी

कोरोनाबाधित मृताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन २ दिवसांच्या रजेवर गेले होते. २ दिवसांची रजा असल्याने प्रभार दिला नाही. मृताविषयी मला रात्री १०:३० वाजता कळले. मला कळले तेव्हा मी अर्जुनीला येण्यासाठी प्रवासात होते. रात्री उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांकडून भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात विलंब झाला, अशी माहिती मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी दिली.