शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अनुपस्थितीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास ...

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास घरात मृतदेह ठेवावा लागला. अखेर त्या बाधित मृतदेहाची रात्री १२ वाजल्यानंतर विल्हेवाट लावावी लागली. हा संतापजनक प्रकार येथील सिग्नलटोली येथे रविवारी (दि. ११) रात्री घडला. शासन कोरोनाप्रती कितीही अलर्ट असले तरी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कशी हेळसांड होते याचा उत्तम नमुना बघावयास मिळाला. या प्रकारामुळे नगरपंचायतप्रती मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिग्नलटोली येथील इसम (५६) हे गुरुवारी (दि. ८) बाधित आढळून आले होते. त्यावेळी कोविड केअर सेंटरची व्यवस्था नसल्याने गृह विलगीकरणात होते. त्यांना आधीच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ते शेळ्या चारण्यासाठी गेले होते. रात्री ७ वाजता श्वसनाचा त्रास होऊ लागला. आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, रात्री ८.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. नोडल अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला कळविले. तातडीने तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मृताच्या घरी भेट दिली. मात्र, नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी कुणीही पोहोचले नाही. यात तब्बल ३ तास लोटले. अखेर रात्री ११.३० वाजता नगरपंचायतचे कर्मचारी मृताच्या घरी ट्रॅक्टर घेऊन दाखल झाले. रात्री १२ वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विलंब होत असल्याने काही काळ शेजाऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. तहसीलदार, नोडल अधिकारी, पोलीस कर्मचारी, तलाठी, आरोग्य कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. आरोग्य विभागाने सोमवारी एक पथक पाठवून परिसरात चाचण्या केल्या.

-------------------

मी रजेवर ----- मुख्याधिकारी

कोरोनाबाधित मृताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन २ दिवसांच्या रजेवर गेले होते. २ दिवसांची रजा असल्याने प्रभार दिला नाही. मृताविषयी मला रात्री १०:३० वाजता कळले. मला कळले तेव्हा मी अर्जुनीला येण्यासाठी प्रवासात होते. रात्री उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांकडून भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात विलंब झाला, अशी माहिती मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी दिली.