शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

शिक्षकांना अतिरिक्त करणारा शासन निर्णय रद्द करा

By admin | Updated: November 30, 2014 23:08 IST

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारी नवी संच मान्यता आणि शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत

गोंंंदिया : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारी नवी संच मान्यता आणि शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना २९ नोव्हेंबर रोजी निवेदन पाठविले आहे. या निवेदनात, अतिरिक्त शिक्षक, प्रोबेशनरी टिचर्स आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पगार आॅनलाईन काढावा, प्रत्येक विषयाला शिक्षक मिळालाच पाहिजे, कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांच्या शिक्षकांचा पूर्णवेळ नियमित शिक्षकाचा दर्जा कायम राहिला पाहिजे, आरटीई कायद्यातील तरतुदींनुसार एप्रिल २०१५ पर्यंत पदवी व आवश्यक अर्हता प्राप्त करण्यासाठी शिक्षकांना संरक्षण द्यावे, अतिरिक्त शिक्षकांचा समावेश होईपर्यंत नव्या नियुक्त्यांना मान्यता देऊ नये आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यां (माध्यमिक) मार्फत राज्याचे शिक्षणमंत्री तावडे यांना निवेदन पाठविले. तसेच शिक्षणमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यावा अन्यथा अधिवेशनाच्या काळात तिव्र आंदोलन केले जाणार असा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनेवाने, कार्याध्यक्ष राजेंद्र पटले, जिल्हा सचिव जितेंद्र पटले, प्रकाश ब्राह्मणकर, जे.एस. घरडे, डी.एस. नाकाडे, प्रफुल ठाकरे, दिलीप रहांगडाले, किशोर पखाले, जी.एच. मौदेकर, जागेश्वर लिल्हारे, एन.आर. बांते, एच.डी. कावळे, पी.एम. मानापुरे आदींनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)