शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी प्रवृत्ती त्यागून गावात शांतता ठेवा

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी,

काचेवानी : गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी, या बाबींची जाणीव गावकऱ्यांना व्हावी या हेतूने गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी परिसरातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सभेचे आयोजन करून जनजागृती मोहिमेची सुरूवात केली आहे. या मोहिमेदरम्यान अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवू नये व त्यांना आपले ओळखपत्र देण्याचे टाळावे, असेही मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत ठाणेदार सुरेश कदम यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगाव कला, बेरडीपार, डोंगरगाव, शहारवानी, कवलेवाडा, रापेवाडा आणि चुटिया या गावांत जनजागृती सभा घेतल्या. यानंतर उर्वरित गावात पुन्हा अशाच सभा घेवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर दिवाळीपर्यंत उत्सव सातत्याने चालणार आहेत. त्यावेळी शांतता भंग होण्याची भीती सर्वांना असते. उत्सवाप्रसंगी ठाणेदार सुरेश कदम यांनी गावागावात घेतलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात सर्वसामान्यांना व नवयुवकांना समजेल अशी मार्गदर्शक माहिती देत असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले आहे. गंगाझरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेरडीपार (काचेवानी) येथील ग्रामपंचायतमध्ये ठाणेदार कदम यांनी गावकऱ्यांची सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश ठाकरे होते. अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हेमंत राऊत व सर्व सदस्य, उपसरपंच जीवन झगेकार, सुरेश झगेकार, पोलीस पाटील हंसराज कटरे, माजी सरपंच गणेश कोल्हटकर, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुखदेव बिसेन, माजी सरपंच भैयालाल जांभूळकर, उपसरपंच धनराज पटले, अलका चौधरी, कामन कटरे, राजू भोंडे व प्रकाश मेश्राम उपस्थित होते. यावेळी आपल्या मार्गदर्शनात ठाणेदारांनी सांगितले की, उत्सवादरम्यान गावात शांतता ठेवावी. भाऊबंदाप्रमाणे सहकार्याने व प्रेमाने उत्सव साजरे करून गावाचे नाव तालुक्यात व जिल्ह्यात गाजेल, असे प्रयत्न करावे. गावातील सर्व नागरिक एकच आहेत, अशी भावना सर्वांनी बाळगावी. वाद होत असतील तर गावातील प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शन व सल्ल्याने ‘गावातील वाद गावातच’ मिटविण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही वाद पोलीस ठाण्यापर्यंत येवू देवू नका. अवैध व्यवसाय व नशेखोरी यातून गुन्हेगारी जन्माला येते. गुन्हेगारी व वादांमुळे स्वत:चा, कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास खुंटतो. एवढेच नव्हे तर वादामुळे वादी व प्रतिवादी या दोघांना त्रास होतो व अकारण आर्थिक अडचन सहन करावी लागते. यासाठी गावातील अवैध धंदे थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.पोलीस ठाणे व कर्मचारी जनतेच्या संरक्षणासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहेत. परंतु जनतेच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. नागरिक पोलीस ठाण्यात येतात, तेव्हा वेळ बिघडलेली व प्रकरण चिरघडले असते. त्यामुळे अशी समस्या निर्माण होण्यापूर्वीच सावधगिरी ठेवावी, असा नागरिकांना त्यांनी सल्ला दिला. यावेळी सभेत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरूष उपस्थित होते. (वार्ताहर)