शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

गुन्हेगारी प्रवृत्ती त्यागून गावात शांतता ठेवा

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी,

काचेवानी : गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी, या बाबींची जाणीव गावकऱ्यांना व्हावी या हेतूने गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी परिसरातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सभेचे आयोजन करून जनजागृती मोहिमेची सुरूवात केली आहे. या मोहिमेदरम्यान अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवू नये व त्यांना आपले ओळखपत्र देण्याचे टाळावे, असेही मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत ठाणेदार सुरेश कदम यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगाव कला, बेरडीपार, डोंगरगाव, शहारवानी, कवलेवाडा, रापेवाडा आणि चुटिया या गावांत जनजागृती सभा घेतल्या. यानंतर उर्वरित गावात पुन्हा अशाच सभा घेवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर दिवाळीपर्यंत उत्सव सातत्याने चालणार आहेत. त्यावेळी शांतता भंग होण्याची भीती सर्वांना असते. उत्सवाप्रसंगी ठाणेदार सुरेश कदम यांनी गावागावात घेतलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात सर्वसामान्यांना व नवयुवकांना समजेल अशी मार्गदर्शक माहिती देत असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले आहे. गंगाझरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेरडीपार (काचेवानी) येथील ग्रामपंचायतमध्ये ठाणेदार कदम यांनी गावकऱ्यांची सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश ठाकरे होते. अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हेमंत राऊत व सर्व सदस्य, उपसरपंच जीवन झगेकार, सुरेश झगेकार, पोलीस पाटील हंसराज कटरे, माजी सरपंच गणेश कोल्हटकर, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुखदेव बिसेन, माजी सरपंच भैयालाल जांभूळकर, उपसरपंच धनराज पटले, अलका चौधरी, कामन कटरे, राजू भोंडे व प्रकाश मेश्राम उपस्थित होते. यावेळी आपल्या मार्गदर्शनात ठाणेदारांनी सांगितले की, उत्सवादरम्यान गावात शांतता ठेवावी. भाऊबंदाप्रमाणे सहकार्याने व प्रेमाने उत्सव साजरे करून गावाचे नाव तालुक्यात व जिल्ह्यात गाजेल, असे प्रयत्न करावे. गावातील सर्व नागरिक एकच आहेत, अशी भावना सर्वांनी बाळगावी. वाद होत असतील तर गावातील प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शन व सल्ल्याने ‘गावातील वाद गावातच’ मिटविण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही वाद पोलीस ठाण्यापर्यंत येवू देवू नका. अवैध व्यवसाय व नशेखोरी यातून गुन्हेगारी जन्माला येते. गुन्हेगारी व वादांमुळे स्वत:चा, कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास खुंटतो. एवढेच नव्हे तर वादामुळे वादी व प्रतिवादी या दोघांना त्रास होतो व अकारण आर्थिक अडचन सहन करावी लागते. यासाठी गावातील अवैध धंदे थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.पोलीस ठाणे व कर्मचारी जनतेच्या संरक्षणासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहेत. परंतु जनतेच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. नागरिक पोलीस ठाण्यात येतात, तेव्हा वेळ बिघडलेली व प्रकरण चिरघडले असते. त्यामुळे अशी समस्या निर्माण होण्यापूर्वीच सावधगिरी ठेवावी, असा नागरिकांना त्यांनी सल्ला दिला. यावेळी सभेत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरूष उपस्थित होते. (वार्ताहर)