शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

नाथजोगी समाजबांधवांचे आधारकार्ड नोंदणी शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

लोकसंस्कृतीच्या घडणीतील महत्त्वाचा घटक म्हणजे नाथजोगी, वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्या, मुरळी, भराडी, पोतराज इत्यादी बारा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून हा समाज ...

लोकसंस्कृतीच्या घडणीतील महत्त्वाचा घटक म्हणजे नाथजोगी, वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्या, मुरळी, भराडी, पोतराज इत्यादी बारा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून हा समाज आपल्या परिचयाचा आहे. मात्र देशभरात विखुरलेला हा नाथजोगी समाज आज अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकला आहे. जिल्ह्यात अशा समाजबांधवांची संख्या सुमारे २-३ हजारांच्या जवळपास आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अख्खे कुटुंब सोबत घेऊन या समाजाची पावले आज इथे तर उद्या तिथे अशीच आजतागायत भटकत आहेत. परिस्थितीनुसार आजही अनेक समाजबांधव पाड्यात, पालावरच्या घरात राहतात. मात्र शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने अनेक सामाजिक समस्यांचा घेरा या समाजाभोवती अधिकच घट्ट झाला आहे. नाथजोगी समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्वही नसल्याने या समाजाच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न कायम आहेत. शासनाने त्यांच्या निवासस्थानाची व शिक्षणाची व्यवस्था केल्यास नाथजोगी समाजबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते. ग्राम अदासी परिसरात नाथजोगी, बैगी भटक्या व आदिवासी समाजाचे लोक राहतात. येथील लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याजवळ जाती व रहिवासीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत अदासी येथे आधारकार्ड बनविण्याचे शिबिर लावून अडचण दूर करण्यास शासनाने पुढाकार घेतला आहे.