शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अबब...२७ हजार क्विंटल धान झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:32 IST

जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा घोळ : २०१६-१७ च्या खरीप हंगामाची खरेदी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी तब्बल २६ हजार ७७६ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली नाही. तर या धानाची नोंद राईस मिलर्स अथवा जिल्हा पुरवठा विभागाकडे नसल्याने कोट्यवधी रूपयाचे धान गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून २७ हजार क्विंटल धान गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्ह्याची ओळख धान्याचे कोठार म्हणून आहे. एकूण कृषी क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्रात धान पिकांची लागवड केली जाते. सन २०१६-१७ च्या हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ५९ हजार ६३४ शेतकºयांकडून १९ लाख ३७ हजार ७८० क्विंटल ७० किलो धान खरेदी करण्यात आले होते. या धानाची किंमत २८४ कोटी ८५ लाख होती. या धानाच्या भरडाईची जबाबदारी ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची होती. त्यानुसार त्यांनी २०८ राईस मिलर्सला १९ लाख २३ हजार ३३१ क्विंटल धान भरडाईसाठी दिले. राईस मिलर्सने १९ लाख ११ हजार ३ क्विंटल धानाची भरडाई करु न १२ लाख ८० हजार ३७२ क्विंटल तांदूळ शासनाला जमा केला. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार सध्यास्थितीत सन २०१६-१७ च्या आधारभूत धान खरेदी पैकी केवळ १५.९१ क्विंटल तांदूळ राईस मिलर्सकडे शिल्लक असल्याची नोंद आहे. परंतु या हंगामात झालेली एकूण खरेदी व त्यानंतर राईस मिलर्सला दिलेल्या धानाची आकडेवारी बघितल्यास खरेदी केलेल्या धानापेक्षा तब्बल १४ हजार ४६६ क्विंटल धान कमी असल्याचे आढळले. तर भरडाईकरिता दिलेला धान व भरडाई झालेला धान यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तब्बल १२ हजार ३१०.७ क्विंटल धान कमी भरडाई झालयाचे उघडकीस आले. खरेदी केलेले आणि त्यानंतर भरडाईसाठी दिलेले व प्रत्यक्षात भरडाई झालेल्या धानाची आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण प्रत्यक्षात खरेदीच्या २६ हजार ७७६.७ क्विंटल धान कमी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.ओल्या धानाच्या नावावर गोरखधंदा?शेतकऱ्यांचे ओले धान मार्केटींग फेडरेशन किंवा आदिवासी विकास विभागाकडून घेतले जात नाही. थोड्याफार प्रमाणात धान ओले असेल तर तूट थोड्या प्रमाणात असू शकते परंतु २७ हजार किलो नव्हे तर क्विंटल धान्याची तूट दाखविणे म्हणजे इतरांना शुध्द मुर्ख बनविण्याचा तर धंदा सुरू नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे खरेदी केलेले धान कर्मचारी, अधिकारी यांच्या मार्फत परस्पर विक्रीला तर गेले नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. धान खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी देताना काही महिन्याचा कालावधी लागतो. या दरम्यान धान वाळत असल्याने वजनात कमतरता येवून तूट निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्यक्षात झालेली खरेदी व भरडाईसाठी दिलेल्या धानात थोडा फरक राहणार आहे.-ए.के. सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.