शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रखडलेल्या पुलासाठी केले अर्ध जलसमाधी आंदोलन! शेकडो नागरिक उतरले वाघ नदीत

By अंकुश गुंडावार | Updated: February 20, 2024 16:47 IST

सविस्तर असे की, मागील 60 ते 70 वर्षापासून पुलाची मागणी होती. अखेर पुल मंजूर झाला, दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

सालेकसा: तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले असल्याने संतप्त नागरिकांनी चक्क वाघ नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करून शासन प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

सविस्तर असे की, मागील 60 ते 70 वर्षापासून पुलाची मागणी होती. अखेर पुल मंजूर झाला, दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. त्या नंतर पुलासाठी खोदकाम करत असताना दगड लागल्याचे कारण देत दोन वर्षापूर्वी खोदकाम अर्धवट ठेवल्याने आधीचा रस्ता बंद पडला. परिणामी नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे. अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत असल्याने त्याला  झोपेतून जागवण्यासाठी 20 फेब्रुवारीला अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भजेपार, बोदलबोडीसह परिसरातील अनेक गावातील नागरिक सहभागी झाले. 

भजेपार येथील सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार आणि बोदलबोडी येथील सरपंच देवेंद्र पटले तथा दोन्ही गावचे प्रमुख पदाधिकारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान सरपंच संघटनेचे गौरीशंकर बिसेन, प्रिया शरणागत, तमील कुमार टेंभरे, नरेश कावरे यांनी आंदोलनात सहभागी होऊन सरपंच संघटनेचा पाठिंबा घोषित करत तेही नदी पात्रात उतरले. आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली असता दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उसेंडी, उप अभियंता मानकर यांनी आंदोलन स्थळी पोहचून लगेच 24 फेब्रुवारी पूर्वी काम सुरू होईल असे लिखित आश्वासन दिले. दरम्यान कामासाठी मशीन देखील पोहचवली. त्यानंतर नदी पात्रात आंदोलन करत असलेले नागरिक बाहेर आले. राष्ट्र वंदना करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलन यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

टॅग्स :Strikeसंप