शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पूर्व विदर्भातील ९७८ मामा तलाव झाले गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 07:15 IST

Gondia News तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील तब्बल ९७८ मामा तलाव गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानंतर उघडकीस तलावांवर वाढले अतिक्रमण संवर्धनाकडे झाले दुर्लक्ष

 

अंकुश गुंडावार

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते जाते. सिंचनाची सोय आणि धानपिकांसाठी अनुकूल वातावरण हे त्या मागील कारण आहे. तसेच पूर्व विदर्भात माजी मालगुजारी (मामा) तलाव मोठ्या प्रमाणात आहे. या मामा तलावांची शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते. परंतु या तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील तब्बल ९७८ मामा तलाव गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मामा तलावांची संख्या सर्वाधिक आहे. मामा तलावांची संख्या अधिक असल्याने हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावांमुळे मासेमारी आणि दुबार पीक घेण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना मदत होत असते. पूर्वी या मामा तलावांचा मालकी हक्क त्या गावातील मालगुजरांकडे होता. त्यानंतर सरकारने या तलावांचा मालगुजारी हक्क संपुष्टात आणला. शंभर हेक्टरपर्यंतचे तलाव जिल्हा परिषदेकडे आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेले तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केले. मात्र कालातंराने या तलावांकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काही तलावांवर अतिक्रमण झाले. तर काहींनी तलावात शेती करुन हे तलावच गायब करुन टाकले. मात्र मागील तीन-चार वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीनंतर या मामा तलावांचे महत्त्व शासनाला कळायला लागले. त्यानंतर राज्य सरकारने मामा तलावांचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली. या तलावांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलली.

लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने तलाठ्यांच्या रेकाॅर्डनेुसार नोंद असलेल्या मामा तलावांची गणना केली. त्यात एकूण ६७३४ मामा तलावांपैकी प्रत्यक्षात ५७५६ मामा तलावच अस्तित्वात असल्याची बाब पुढे आली. तर सर्वाधिक मामा तलावांवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अतिक्रमण झाले असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, हा अहवाल सुध्दा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

संवर्धन करणार केव्हा

बरेचदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमाविण्याची वेळ येते. तेव्हा या मामा तलावांची शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी मदत होते. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून मामा तलावांच्या संवर्धनाकडे जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच सिंचनासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

 

टॅग्स :Waterपाणी