शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील ९७८ मामा तलाव झाले गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 07:15 IST

Gondia News तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील तब्बल ९७८ मामा तलाव गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानंतर उघडकीस तलावांवर वाढले अतिक्रमण संवर्धनाकडे झाले दुर्लक्ष

 

अंकुश गुंडावार

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते जाते. सिंचनाची सोय आणि धानपिकांसाठी अनुकूल वातावरण हे त्या मागील कारण आहे. तसेच पूर्व विदर्भात माजी मालगुजारी (मामा) तलाव मोठ्या प्रमाणात आहे. या मामा तलावांची शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते. परंतु या तलावांच्या संवर्धनाकडे लघु पाटबंधारे विभाग आणि जि.प.चे दुर्लक्ष झाल्याने पूर्व विदर्भातील तब्बल ९७८ मामा तलाव गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मामा तलावांची संख्या सर्वाधिक आहे. मामा तलावांची संख्या अधिक असल्याने हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावांमुळे मासेमारी आणि दुबार पीक घेण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना मदत होत असते. पूर्वी या मामा तलावांचा मालकी हक्क त्या गावातील मालगुजरांकडे होता. त्यानंतर सरकारने या तलावांचा मालगुजारी हक्क संपुष्टात आणला. शंभर हेक्टरपर्यंतचे तलाव जिल्हा परिषदेकडे आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेले तलाव लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केले. मात्र कालातंराने या तलावांकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे काही तलावांवर अतिक्रमण झाले. तर काहींनी तलावात शेती करुन हे तलावच गायब करुन टाकले. मात्र मागील तीन-चार वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीनंतर या मामा तलावांचे महत्त्व शासनाला कळायला लागले. त्यानंतर राज्य सरकारने मामा तलावांचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली. या तलावांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलली.

लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने तलाठ्यांच्या रेकाॅर्डनेुसार नोंद असलेल्या मामा तलावांची गणना केली. त्यात एकूण ६७३४ मामा तलावांपैकी प्रत्यक्षात ५७५६ मामा तलावच अस्तित्वात असल्याची बाब पुढे आली. तर सर्वाधिक मामा तलावांवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अतिक्रमण झाले असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, हा अहवाल सुध्दा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

संवर्धन करणार केव्हा

बरेचदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमाविण्याची वेळ येते. तेव्हा या मामा तलावांची शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी मदत होते. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांपासून मामा तलावांच्या संवर्धनाकडे जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच सिंचनासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

 

टॅग्स :Waterपाणी