शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: January 18, 2016 02:03 IST

यावर्षी आधीच धानाचा उतारा कमी आला आहे. त्यात धानाला योग्य भाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा आरोप : घोषणाबाज सरकार जिल्ह्यासाठी काही करणार की नाही?गोंदिया : यावर्षी आधीच धानाचा उतारा कमी आला आहे. त्यात धानाला योग्य भाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी दोन्ही बाजुने पिसला जात असताना जेमतेम १० टक्के गावांची पैसेवारी ५० टक्केच्या कमी दाखवून ९० टक्के शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोंदियात रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना खा.पटेल शेतकऱ्यांच्या या परिस्थितीने व्यथित झाले होते. आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पद्धतीने काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पण आता खरी परिस्थिती लपवून ठेवून पैसेवारी जास्त दाखविल्या जात असून ९० टक्के शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, असे खा.पटेल म्हणाले.वास्तविक यावर्षी वरून पिक चांगले दिसत असले तरी कीडीमुळे धानाचा उतारा आला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणे गरजेचे आहे. आधीच धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले. त्यात आमच्या काळात शेतकऱ्यांना मिळत होता तेवढाही दर एचएमटी, जय श्रीराम या वाणांना आता मिळेनासा झाला आहे. जिल्ह्यातील ९० टक्के गावांमधील पैसेवारी ५० टक्केपेक्षा जास्त दाखविल्यामुळे त्यांच्याकडील कर्जाची सक्तीने वसुली न करणे व इतर शासकीय लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. गेल्या दिड वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना खा.पटेल म्हणाले, जिल्ह्यातील लोकांमध्ये सरकारबद्दल नैराश्य पसरत आहे. कारण सरकार घोषणा आणि मार्केटिंग करण्यात पटाईत असले तरी प्रत्यक्षात लोकांसाठी काय करीत आहे हे कोणालाच समजेनासे झाले आहे. जिल्ह्यातून मागास क्षेत्र विकास योजना बंद केली. राष्ट्रीय कृषी विकास योजना गुंडाळली. एमआरइजीएसचा निधी कमी केला, एपीएल कार्डधारकांचे धान्य, केरोसीन बंद केले. वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य लोकांच्या नाकी नऊ येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)