शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

साथीसाठी ९७ गावे जोखीमग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:09 IST

पावसाळ्यात साथीचे आजार पसरत असल्याने साथीचे आजार पसरू नये यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सक्रीय झाला आहे.

तीन ग्राम पंचायतींना रेडकार्ड : तीन वर्षांत सहा गावात साथीचा उद्रेक नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पावसाळ्यात साथीचे आजार पसरत असल्याने साथीचे आजार पसरू नये यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सक्रीय झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९७ गावे साथीच्या आजारासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाऊ लागल्याने या गावांकडे विशेष लक्ष देण्याचा इशारा आरोग्य विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. पावसाळा सुरू झाला आहे. कधी जोराने पाऊस बरसेल याचा नेम नाही. त्यासाठी पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नये तसेच साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने गावागावात औषध साठा पोहचविला आहे. गोंदिया जिल्ह्यात धरण, तलाव, नद्या असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पूरपरिस्थिती लवकरच निर्माण होते. नदीच्या काठावरील गावे ही पूर सदृस्य गावे गणली जातात. गोंदिया जिल्ह्यातील ८८ गावे ही पूरग्रस्त आहेत. तर साथीच्या आजाराला आमंत्रण देणारे ९७ गावे जोखीमग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातून वैनगंगा, गाढवी, वाघनदी, पांगोली, चुलबंद ह्या नद्या वाहतात.या नद्यांच्या काठावरील ८८ गावे ही पूराने नेहमी वेढली जातात. अश्या गावात पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने या गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या तीन महिन्यात साथीच्या आजारावर सहजरित्या मात करता येईल यासाठी आरोग्य विभागाने गावागावात औषध पोहचविली आहे. साथीच्या आजारासाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गावांसाठी प्रत्येकी एक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला समन्वयक म्हणून नेमले आहे. साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत ७५ टक्यापेक्षा अधिक टक्के पाणी दूषीत असेल त्या गावाला रेडकार्ड जिल्हा परिषदेकडून दिला आहे. यंदा रेडकार्ड असलेल्या जिल्ह्यातील तीन ग्राम पंचायती आहेत. टोयागोंदी, येडमाकोट व नवेगाव ह्या तीन ग्राम पंचायती रेडकार्डमध्ये आहेत. साथीच्या आजारासंदर्भात उपचारासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील जलसरक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सहा गावात साथीचा उद्रेक मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील या सहा गावात साथीचा उद्रेक झाला आहे. सुकडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ठाणेगाव, केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ईळदा, खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फुलचूर, धाबेपवनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवेगावबांध, फुटाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नक्टीटोला, ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ककोडी ह्या सहा गावात साथीचा उद्रेक झाला होता. हे करा, ते करू नका पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा किंवा लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करावा, जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरीनच्या गोळ्या किंवा द्रावण टाकावेत, शौचाला जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, जुलाब झाल्यास ओआरएस पाकीटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत, तसेच ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी, आंबील भरपूर प्यावी, उघड्यावरील अन्न, कापलेली फळे खाऊ नयेत, उघड्यावर माशा बसलेले अन्न खाऊ नये, उघड्यावर शौचास बसू नये, अस्वच्छ वअसुरक्षीत पाणी पिऊ नये, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी केले आहे. शीघ्र प्रतिसाद पथक साथीच्या आजारावर वेळीच मात करण्यासाठी आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जिल्हा हिवताप अधिकारी, सामान्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.