शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

९४ टक्के तलावांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:36 IST

शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देसजीवांवर जलसंकट : मामा तलावांसह लघु प्रकल्पही पडले कोरडे

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसरले आहेत. काही लघु प्रकल्पसुद्धा कोरडे पडले आहेत. आतापासूनच जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु झाल्याचे चित्र आहे.तालुक्यात एप्रिल महिन्यातच पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याने पुढील तीन महिने पाण्याअभावी कसे जाणार, अशी चिंता तालुकावासीयांना सतावित आहे. तालुक्यात माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव) एकूण १६१ असून यापैकी जेमतेम सहा तलावांत थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक असून बाकीचे सर्व तलाव कोरडे झाले आहेत. मामा तलावांपैकी फक्त ३.७२ टक्के तलावांत पाणी उरले असून तेसुद्धा पुढील एका महिन्यात संपूर्ण नाहिसे होईल व सर्व मामा तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे.लघू पाटबंधारे विभागातर्गंय तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यापैकी पाच तलावांमध्येच पाणी शिल्लक आहे. एकूण १७ टक्के तलावांत पाणी शिल्लक आहे. लघु सिंचन प्रकल्पाचे एकूण १२० तलाव असून या तलावांपैकी २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तलावाच्या भरवशावर पाण्याची गरज भागविणारे प्राणी कुठे जातील, असा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे.मध्यम प्रकल्पात मोजकाच पाणीसाठातालुक्यात पुजारीटोला धरणासह कालीसरार, मानागड, मानाकुही यासारखे मध्यम प्रकल्प सुद्धा आहेत. परंतु या मध्यम प्रकल्पामध्येही पुरेसा पाणीसाठा राहिलेला नाही. पुजारीटोला धरणात राखीवपेक्षा कमी पाणी असून या धरणातून मोेठे कालवे गेलेले आहेत. ते सालेकसासह आमगाव, गोंदिया तालुक्याला आणि मध्यप्रदेशच्या लांजी, किरणापूर तालुक्याला सुद्धा पाणी पुरवठा करतात. परंतु यासाठी सिरपूरबांधचे पाणी असून वितरित करावे लागते. मात्र जलाशयात मोजके पाणी असून पाण्याचा अपव्यय थांबविणे मोठे आवाहन आहे.साठवण बंधारे १०० टक्के कोरडेतालुक्यात एकूण लोप बंधारे ४१ असून साठवण बंधारे १६८ च्या संख्येत आहेत. परंतु सदर दोन्ही प्रकारचे बंधारे कोरडे पडले असून सध्या शंभर टक्के उपयोगहीन झाले आहेत. लघू बंधारे व साठवण बंधारे जनावरांसाठी पाण्याची सोय म्हणून फार उपयोगी असतात. परंतु आता त्यात पाणीच नाही. त्यामुळे त्याकडे कोणी ढुकूनसुध्दा पाहत नाही. सदर बंधाऱ्यांमध्ये पाणी उरले नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत धोका निर्माण होत आहे. परंतु त्यापेक्षा मोठे संकट वन्यप्राण्यांच्या जीवावरही ओढवले आहे. त्यामुळे साठवण बंधाºयामध्ये शासनस्तरावर तात्पुरता पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.काही मोजक्या तलावांमध्ये पाणीतालुक्यातील ९० टक्क्यांच्या वर तलाव कोरडे झाले असून काही गावामध्ये पाण्याचे संकट भासू लागले आहेत. तर तालुक्यातील काही मोजके तलाव आहेत, त्यात १० ते १५ टक्के जलसाठा उरलेला आहे. अनेक ठिकाणी पाच टक्केही जलसाठा राहिला नाही. मामा तलावांपैकी हलबीटोला, झालीया, कावराबांध, जोशीटोला, मरकाखांदा, रामसागर (मानागढ) येथील तलावांत काही प्रमाणात पाणी उरले आहे. लघु पाटबंधारेपैकी भजियादंड, पाऊलदौना, पिपरिया, बिजेपार या ठिकाणी पाण्याचा साठा शिल्लक आहे.