शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

८७ गावांना अतिवृष्टीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:58 IST

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम : हजारो कुटुंबे उघड्यावर येण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. परिणामी, हजारो कुटूंबे उघड्यावर येण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाकडून त्यादृृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्या तरी, पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. मृग नक्षत्राला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. याच नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु होत असल्याचे बोलले जाते. तशी वातावरण निर्मिती देखील झाली आहे. सकाळी ऊन, सायंकाळी तुरळक पाऊस हे चित्र सद्य:स्थितीत जिल्ह्यात आहे. पावसाळ्यात कधी मुसळधार तर, कधी अतिवृष्टी होते. याचा फटका अनेकांना चांगलाच बसतो. त्यात नदीकाठावर वसलेल्या लोकांचे हाल होतात. बाघ, पुजारीटोला, कालीसरार, इटियाडोह हे मोठे तर, खैरबंदा, संग्रामपूर, बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, चुलबंद, उमरझरी, मानागढ, कटंगी, कलपाथरी आदी मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. वैनगंगा, गाढवी, बाघनदी, पांगोली नदी, चुलबंद नदी जिल्ह्यातून वाहते. गोंदिया तालुक्यातील ११, तिरोडा तालुक्यातील १३ गावे वैनगंगा नदीकाठावर वसले आहेत. गोंदिया तालुक्यातील पाच, आमगाव तालुक्यातील १६, सालेकसा तालुक्यातील ११ गावे, देवरी तालुक्यातील ११ गावे ही बाघनदी काठावर वसले आहेत. आंभोरा, बरबसपुरा, फुलचूर (जिल्हा कार्यालयाकडील भाग) ही गोंदिया तालुक्यातील तीन गावे पांगोली नदीकाठावर आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ गावे चुलबंद नदीकाठावर आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ गावे गाढवी नदीकाठावर वसली आहेत. मुसळधार आणि अतिवृष्टीत या गावांना दरवर्षीच पूराचा फटका बसतो. अनेकांची घरे जमीनदोस्त होतात. काही घरांच्या पायथ्याशी नदीचे पाणी येते. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यात मोठी अडचण होते. अनेकांना बाहेर पडणेही कठीण होऊन जाते. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होतो. जनावरे मरणासन्न अवस्थेत असतात. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.