शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

८७ गावांना अतिवृष्टीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:58 IST

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम : हजारो कुटुंबे उघड्यावर येण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. परिणामी, हजारो कुटूंबे उघड्यावर येण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाकडून त्यादृृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्या तरी, पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. मृग नक्षत्राला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. याच नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु होत असल्याचे बोलले जाते. तशी वातावरण निर्मिती देखील झाली आहे. सकाळी ऊन, सायंकाळी तुरळक पाऊस हे चित्र सद्य:स्थितीत जिल्ह्यात आहे. पावसाळ्यात कधी मुसळधार तर, कधी अतिवृष्टी होते. याचा फटका अनेकांना चांगलाच बसतो. त्यात नदीकाठावर वसलेल्या लोकांचे हाल होतात. बाघ, पुजारीटोला, कालीसरार, इटियाडोह हे मोठे तर, खैरबंदा, संग्रामपूर, बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, चुलबंद, उमरझरी, मानागढ, कटंगी, कलपाथरी आदी मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. वैनगंगा, गाढवी, बाघनदी, पांगोली नदी, चुलबंद नदी जिल्ह्यातून वाहते. गोंदिया तालुक्यातील ११, तिरोडा तालुक्यातील १३ गावे वैनगंगा नदीकाठावर वसले आहेत. गोंदिया तालुक्यातील पाच, आमगाव तालुक्यातील १६, सालेकसा तालुक्यातील ११ गावे, देवरी तालुक्यातील ११ गावे ही बाघनदी काठावर वसले आहेत. आंभोरा, बरबसपुरा, फुलचूर (जिल्हा कार्यालयाकडील भाग) ही गोंदिया तालुक्यातील तीन गावे पांगोली नदीकाठावर आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ गावे चुलबंद नदीकाठावर आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ गावे गाढवी नदीकाठावर वसली आहेत. मुसळधार आणि अतिवृष्टीत या गावांना दरवर्षीच पूराचा फटका बसतो. अनेकांची घरे जमीनदोस्त होतात. काही घरांच्या पायथ्याशी नदीचे पाणी येते. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यात मोठी अडचण होते. अनेकांना बाहेर पडणेही कठीण होऊन जाते. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होतो. जनावरे मरणासन्न अवस्थेत असतात. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.