जिल्हा बँक पुन्हा अग्रेसरगोंदिया : ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यंदा उद्दीष्टपूर्ती करण्यात माघारली आहे. असे असतानाही राष्ट्रीय व ग्रामीण बॅँकांच्या तुलनेत मात्र जिल्हा बँक यंदाही अग्र्रेसर आहे. यंदा जिल्हा बँकेने ८९ टक्के खरिप हंगामाचे कर्जवाटप केले असून पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याला धानाचे कोठार अशी गोंडस ख्याती देण्यात आली असली तरिही येथील शेतकऱ्यांची वास्तवीक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाची मार यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येत असून यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. तर शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. यात राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. हे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेला आत्मीयतेचा भाव दिसून येतो. परिणामी जिल्हा बँक ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. यंदा मात्र जिल्हा बँक कर्ज वाटपात आपली उद्दीष्ट पूर्ती करून शकलेली नाही. यंदा जिल्हा बँकेला १२६.५० कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने ३२ हजार ६३६ शेतकऱ्यांना ११२.३२ कोटी कर्जवाटप केले आहे. (शहर प्रतिनिधी)
८९ टक्के कर्जवाटप उद्दिष्टपूर्ती फसली :
By admin | Updated: September 29, 2016 00:18 IST