शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:21 IST

अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता.

ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रमाबाबत उदासीनता : प्रत्येक तालुक्यातून ९५ लाभार्थ्यांची घट

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु यंदा फक्त ५७१ विद्यार्थिनींनाच सायकली देण्याची तरतूद आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यातील ९५ म्हणजेच जिल्ह्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकल पासून वंचित ठेवण्यात आले.शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अमंलात आणली. शून्य ते पाच किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक होते. परंतु आता प्रत्येक तालुक्याला फक्त ५७१ सायकल देण्याचे ढिसाळ नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो गरीब विद्यार्थिनी सायकलींपासून वंचीत राहात आहेत.गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असल्याने पाच हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देणे अपेक्षित होते. परंतु यंदा प्रत्येकच तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांना लाभ देता येणार नाही असे ढिसाळ नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनी सायकलपासून वंचीत आहेत.जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ मागण्यासाठी हात पुढे करून आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाºया अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थिनी वंचित राहात आहेत.सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे पाच हजार ३२८ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु त्यानंतर कमी मुलींना लाभ देण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील ९५ विद्यार्थिनी अशाप्रकारे जिल्हाभरातील आठ तालुक्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकलपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.१० हजाराहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेतमानव विकास योजनेंतर्गत सायकल करीता आता तीन हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. यासाठी गोरगरिबांच्या मुलींना या योजनेचा लाभ न देता आपल्या मर्जीतील लोकांच्या पाल्यांना सायकलचा लाभ देतात. उर्वरीत मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही. १० हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकलची प्रतिक्षा आहे.सायकलचे आमिष देत घेतात अ‍ॅडमिशनविद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तुकडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी फिरू लागले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना अ‍ॅडमिशन घ्या सायकल देऊ असे आमिष दिले जात आहे. त्या आमिषाची काही ठिकाणी पुर्तता केली जाते, तर काही ठिकाणी पूर्तता केली जात नाही. मुलींना सायकलचे दिलेले आमिष पूर्ण करण्यासाठी मानव विकासच्या सायकलींचा आधार घेतला जात आहे.सायकलची किंमत वाढल्याने ५०० रूपयांनी लाभात वाढसायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार ५०० रूपये त्यांच्या खात्यात टाकले जाते. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे देतात, शिक्षणाधिकारी हा निधी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थिनींच्या खात्यात सुरूवातीला दोन हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरित दीड हजार रूपये त्यांना दिले जाते. पूर्वी तीन हजार रूपये दिले जात होते. आता सायकलच्या किंमती वाढल्यामुळे तीन हजार ५०० रूपये लाभ देण्यात येतो.एक कोटी ६० लाखांचेच नियोजनसायकलच्या किमती वाढल्या त्यामुळे लाभार्थ्यांंना ५०० रूपये अधिक देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला एक कोटी ६० लाख रूपये दिले जातात. पूर्वीचीच रक्कम जिल्ह्याला मिळत असते. आणि सायकलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कमी लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र