शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

७६० विद्यार्थिनी सायकलला मुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:21 IST

अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता.

ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रमाबाबत उदासीनता : प्रत्येक तालुक्यातून ९५ लाभार्थ्यांची घट

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु यंदा फक्त ५७१ विद्यार्थिनींनाच सायकली देण्याची तरतूद आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक तालुक्यातील ९५ म्हणजेच जिल्ह्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकल पासून वंचित ठेवण्यात आले.शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अमंलात आणली. शून्य ते पाच किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक होते. परंतु आता प्रत्येक तालुक्याला फक्त ५७१ सायकल देण्याचे ढिसाळ नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो गरीब विद्यार्थिनी सायकलींपासून वंचीत राहात आहेत.गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असल्याने पाच हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देणे अपेक्षित होते. परंतु यंदा प्रत्येकच तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांना लाभ देता येणार नाही असे ढिसाळ नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनी सायकलपासून वंचीत आहेत.जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ मागण्यासाठी हात पुढे करून आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाºया अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थिनी वंचित राहात आहेत.सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे पाच हजार ३२८ मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु त्यानंतर कमी मुलींना लाभ देण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील ९५ विद्यार्थिनी अशाप्रकारे जिल्हाभरातील आठ तालुक्यातील ७६० विद्यार्थिनींना सायकलपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.१० हजाराहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेतमानव विकास योजनेंतर्गत सायकल करीता आता तीन हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. यासाठी गोरगरिबांच्या मुलींना या योजनेचा लाभ न देता आपल्या मर्जीतील लोकांच्या पाल्यांना सायकलचा लाभ देतात. उर्वरीत मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही. १० हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकलची प्रतिक्षा आहे.सायकलचे आमिष देत घेतात अ‍ॅडमिशनविद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तुकडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी फिरू लागले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना अ‍ॅडमिशन घ्या सायकल देऊ असे आमिष दिले जात आहे. त्या आमिषाची काही ठिकाणी पुर्तता केली जाते, तर काही ठिकाणी पूर्तता केली जात नाही. मुलींना सायकलचे दिलेले आमिष पूर्ण करण्यासाठी मानव विकासच्या सायकलींचा आधार घेतला जात आहे.सायकलची किंमत वाढल्याने ५०० रूपयांनी लाभात वाढसायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार ५०० रूपये त्यांच्या खात्यात टाकले जाते. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे देतात, शिक्षणाधिकारी हा निधी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थिनींच्या खात्यात सुरूवातीला दोन हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरित दीड हजार रूपये त्यांना दिले जाते. पूर्वी तीन हजार रूपये दिले जात होते. आता सायकलच्या किंमती वाढल्यामुळे तीन हजार ५०० रूपये लाभ देण्यात येतो.एक कोटी ६० लाखांचेच नियोजनसायकलच्या किमती वाढल्या त्यामुळे लाभार्थ्यांंना ५०० रूपये अधिक देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला एक कोटी ६० लाख रूपये दिले जातात. पूर्वीचीच रक्कम जिल्ह्याला मिळत असते. आणि सायकलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कमी लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र