शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७५ हजार कुटुंब झाली धूरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:36 IST

धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे.

ठळक मुद्दे८२ टक्के नियमित वापर : पहिले सहा महिने अनुदान कपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाले आहे.प्रत्येक कुटुंबाचे स्वयंपाक घर धूर मुक्त व्हावे, गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपुर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगतचे कुटुंब यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या निर्माण होते. तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषणात सुध्दा वाढ होत होती. स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाली होती. हे टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत तिन्ही मुख्य गॅस वितरण कंपन्याकडून गोंदिया जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांची टक्केवारी ८९.५ टक्के झाली आहे.या योजनेमुळे ३४.४ टक्के गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी ८२ टक्के कुटुंब नियिमित गॅस सिलिंडर भरुन त्याचा वापर करीत असल्याचा दावा हिंदुस्थान पेट्रोलियमचे जिल्हा नोडल अधिकारी आदित्य टांक यांनी केला. लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन दिले जात आहे. गॅस कनेक्शनची रक्कम सिलिंडरवर दिल्या जाणाºया अनुदानात कपात केली जात होती. मात्र यामुळे गॅस सिलिंडरची उचल करणाºया ग्राहकांची संख्या कमी झाली होती.त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश साध्य होत नव्हता. यासाठी शासनाने लाभार्थ्याना गॅस कनेक्शन दिल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने कनेक्शनची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गॅस सिलिंडरची नियमित उचल करुन वापर करणाºयांची संख्या वाढली असून जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाल्याचे चित्र आहे.राज्यात पाच कोटी गॅस कनेक्शन वाटपाचे उद्दिष्टउज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात मार्च २०१९ पर्यंत दारिद्र्यरेषेखालील ५ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. राज्यात १८ डिसेंबरपर्यंत १ कोटी ५६ लाख लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.धूरमुक्त जिल्हा आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी उज्ज्वला योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.- आदित्य टांक, जिल्हा नोडल अधिकारी हिदुस्थान पेट्रोलियम.