शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यातील ७५ हजार कुटुंब झाली धूरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:36 IST

धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे.

ठळक मुद्दे८२ टक्के नियमित वापर : पहिले सहा महिने अनुदान कपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाले आहे.प्रत्येक कुटुंबाचे स्वयंपाक घर धूर मुक्त व्हावे, गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपुर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगतचे कुटुंब यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या निर्माण होते. तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषणात सुध्दा वाढ होत होती. स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाली होती. हे टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत तिन्ही मुख्य गॅस वितरण कंपन्याकडून गोंदिया जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांची टक्केवारी ८९.५ टक्के झाली आहे.या योजनेमुळे ३४.४ टक्के गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी ८२ टक्के कुटुंब नियिमित गॅस सिलिंडर भरुन त्याचा वापर करीत असल्याचा दावा हिंदुस्थान पेट्रोलियमचे जिल्हा नोडल अधिकारी आदित्य टांक यांनी केला. लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन दिले जात आहे. गॅस कनेक्शनची रक्कम सिलिंडरवर दिल्या जाणाºया अनुदानात कपात केली जात होती. मात्र यामुळे गॅस सिलिंडरची उचल करणाºया ग्राहकांची संख्या कमी झाली होती.त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश साध्य होत नव्हता. यासाठी शासनाने लाभार्थ्याना गॅस कनेक्शन दिल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने कनेक्शनची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गॅस सिलिंडरची नियमित उचल करुन वापर करणाºयांची संख्या वाढली असून जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाल्याचे चित्र आहे.राज्यात पाच कोटी गॅस कनेक्शन वाटपाचे उद्दिष्टउज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात मार्च २०१९ पर्यंत दारिद्र्यरेषेखालील ५ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. राज्यात १८ डिसेंबरपर्यंत १ कोटी ५६ लाख लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.धूरमुक्त जिल्हा आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी उज्ज्वला योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.- आदित्य टांक, जिल्हा नोडल अधिकारी हिदुस्थान पेट्रोलियम.