शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के मतदान

By admin | Updated: July 1, 2015 02:06 IST

जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले.

नावे वगळली : अनेक जण अधिकारापासून वंचितगोंदिया : जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३०) जिल्ह्यातील ११०५ केंद्रांवर मतदान झाले. रात्री ९ पर्यंत प्राप्त टक्केवारीनुसार सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकारामुळे त्यांना वंचित राहावे लागले. हा प्रकार सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले.जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अशा संवेदनशिल मतदान केंद्रांवरही कोणता अनुचित प्रकार घडला नाही.जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात २३७ आणि तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ असे एकूण ६६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामीण राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. युवा मतदारांपेक्षाही वयोवृद्ध नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर होते. विशेष नक्षलग्रस्त भागातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही प्रमाणीला प्राधान्य दिले.बाराभाटी परिसरात नागरिक शेती कामामध्ये जास्त गुंतून असल्याने दुपारी ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. या परिसरात संपूर्ण टक्केवारी काढली असता ७० टक्केपेक्षा कमीच झाल्याचे सांगण्यात आले. नवीन मतदार आणि तरुण मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. नक्षलग्रस्त संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.देवीर, सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यांसह आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. त्यामुळे तेथील मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत गर्दी होती. बाकी केंद्रांवर सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान असल्याने संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पुन्हा गर्दी उसळली.मतमोजणी ६ जुलैलाया निवडणुकीच्या निकालासाठी ६ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आणखी ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.