शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

कुपोषणाने ७३ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: May 18, 2015 00:47 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे.

नरेश रहिले गोंदियाआदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात बालमृत्यूची आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. याबाबीत आरोग्य विभागाकडून वर्षभरात आठच बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ६५ बालक तर अतितीव्र्र कमी वजनाची आठ अशी एकूण ७३ बालके वर्षभरात दगावली आहेत. यातून जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च १०१५ या काळात गोंदिया जिल्ह्यात १८ हजार ६६८ बालके जन्मली. त्यात ग्रामीण भागात १२ हजार ४४४ बालके तर शहरी भागात ६ हजार २२४ बालके जन्मली आहेत. यात ग्रामीण भागातील २११ तर शहरी भागातील २७६ बालकांचा अशा एकूण ४८७ बालकांचा वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. याशिवाय सामान्य श्रेणीतील ९५ बालके, कमी वजनाची ४३ बालके, तर कुपोषणाच्या श्रेणीतील तीव्र्र कमी वजनाची ६५ बालके तर अतितीव्र कमी वजनाची आठ बालके दगावली आहेत. अशाप्रकारे तीव्र व अतितीव्र्र कमी वजनाची ७३ बालके दगावली आहे. कुपोषण मुक्तीसाठी शासन मोठे प्रयत्न करीत असले तरीही गोंदिया जिल्ह्यात कुपोषण थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. परंतु तीव्र्र कमी वजनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग कुपोषणाने मृत्यू मानत नाही. अती तीव्र कमी वजनाच्या बालकांनाच कुपोषित समजून त्यांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याचे मानते. ज्यांचे वजन तीव्र कमी आहे ते कुपोषित नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाने फक्त आठ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभाग देतो. गोंदिया जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र्र वजनाने ७३ बालकांचा मृत्यू झाला असला तरी महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.अंगणवाडीच्या तीन श्रेणीआंगणवाडी कडून बालकांची पाहणी करताना तीन श्रेणीत त्यांच्याकडून पाहणी होते. पहिली श्रेणी सर्वसाधारण, दुसरी श्रेणी कमी वजन व तिसरी श्रेणी तीव्र कमी वजन असते. कमी वजन व तीव्र कमी वजनाची बालके कुपोषणाच्या वाटेवर असतात. परंतु वेळेत त्यांना संकरीत आहार मिळाला तर त्यांच्यात बदल होऊन ते सामान्य श्रेणीत येतात. तीव्र कमी वजनाच्या बालकांना कुपोषित समजण्यात येते. जिल्ह्यात या श्रेणीतील ७३ बालके मृत्युमुखी पडली आहेत. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षगोंदिया जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. ग्रामीण भागातील महिला गर्भवती असतानाही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. गर्भावस्थेतही त्यांना संकरीत आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटात असलेले बाळ कुपोषित म्हणून जन्माला येते. हेच कारण आहे की गर्भवती मातांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांच्या बाळांच्या माध्यमातून पुढे येते. कुपोषण हे त्याचेच परिणाम आहे.