शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

लपाचे ७२५ प्रकल्प नादुरूस्त

By admin | Updated: May 21, 2016 01:43 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत.

११८८ तलावांना दुरुस्तीची गरज१७३८ विहिरी लवकरच बांधणारजिल्ह्यात १४२१ मामा तलावनरेश रहिले गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७२५ प्रकल्प नादुरूस्त आहेत. १९० लघु सिंचन तलावपैकी १०७ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ११५ नादुरूस्त, १२ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलावांपैकी ६ नादुरूस्त, १३४९ साठवण बंधाऱ्यांपैकी १३३ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ३५५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास लघु पाटबंधारे विभाग कसा उदासीन आहे याची प्रचिती येते.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ११८८ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही. परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात.जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १९० लघुसिंचन तलाव, २९४ कोल्हापुरी बंधारे, १२ उपसा सिंचन योजना, २६ पाझर तलाव, १३४९ साठवण बंधारे तर १४२१ माजी मालगुजारी तलाव आहेत. एप्रिल महिन्यात या पैकी २५ टक्के मामा तलावात ३० टक्के पाणी होते. २५ टक्के तलावांमध्ये १० टक्के पाणी तर ५० टक्के तलाव कोरडे पडले होते. आता मे ८० टक्के तलावात थेंबभर पाणी नाही स्थिती झाली आहे.३९५१ पैकी १६४७ विहिरींचे काम पूर्णशासनाने जवाहर विहिरींची योजना सन २००८ मध्ये अमंलात आणली. योजना सुरू झाल्यापासून एप्रिल २०१६ पर्यंत शासनाने गोंदिया जिल्ह्यात ३ हजार ९५१ विहिरी मंजूर केल्या. मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यात फक्त १ हजार ६४७ विहिरींचे काम करण्यात आले. ५६६ विहिरींचे काम सुरू असून १ हजार ७३८ विहिरींच्या बांधकामाची सुरूवात करण्यात आली नाही.तालुकानिहाय अपूर्ण असलेल्या विहीरीआमगाव तालुक्यात १४२ विहिरींच्या कामाला सुरूवातच केली नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २३६, देवरी तालुक्यात १३६, गोंदिया तालुक्यात २५३, गोरेगाव तालुक्यात ४५०, सडक अर्जुनी तालुक्यात १२०, सालेकसा तालुक्यातील १४१, तिरोडा तालुक्यातील २७८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही. जिल्ह्यात ३९५१ विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी १६४७ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर ५६६ विहिरींचे काम प्रगतिपथावर आहेत. १७३८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही, हे विशेष.