शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

७२ लाखांचे सोने गायब

By admin | Updated: January 7, 2017 02:07 IST

गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई

दुसऱ्या आरोपींच्या शोधात पोलीस : सोलापूरच्या तीन आरोपींकडून काहीही मिळाले नाही गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई यांच्या ७२ लाख रूपये किमतीच्या झालेल्या सोन्याच्या चोरीचा अद्याप काहीही सुगावा लागला नाही. २० आॅक्टोबरला दुपारी झालेल्या या चोरीच्या संशयावरून रेल्वे पोलिसांनी तीन व्यक्तींना पकडले. परंतु त्या व्यक्तींजवळून न सोने मिळाले न कोणतीही रोख रक्कम. त्यामुळे सदर तिघांना सोडून देण्याची पाळी पोलिसांवर आली. शेवटी हे सोने कुठे गायब झाले, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. १९ आॅक्टोबरला मुंबईवरून सोने विक्रीसाठी गोंदियात आलेल्या भरत यांनी त्याच दिवशी बालाघाटला जावून सोने व्यापाऱ्यांची भेट घेतली व गोंदियाला परत आले. दुसऱ्या दिवशी २० आॅक्टोबरला ते रायपूरला जाण्यासाठी निघाले. परंतु जेव्हा ते गोंदिया रेल्वे स्थानकावरून इंटरसिटी एक्सप्रेच्या बोगी एस-६ मध्ये बसले, ट्रेन सुटताच ते लघुशंकेसाठी गेले. या दरम्यान त्यांच्या बॅगमधून काही लोकांनी सोने गायब केले. या संदर्भात गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाला तहसीलच्या तीन व्यक्तींना वेगवेगळ्या दिवसी ताब्यात घेतले. यात करमाला तालुक्याच्या सालसे गावातील रहिवासी पप्पू उर्फ शरद रामा काले (२८), जेऊर येथील रहिवासी रविंद्र बलभीम भुजरतकर (६५) व सालसे येथील रहिवासी हर्षद उर्फ चंद्रकांत रामा काले (३२) यांचा समावेश आहे. त्यांना नागपूर येथील रेल्वे न्यायालयात सादर केल्यानंतर सोने जप्तीसाठी त्यांना त्यांच्या गावी पोलिसांनी नेले. परंतु त्यांच्याजवळून सोने जप्त होवू शकले नाही. त्यामुळे त्यांना सोडणे भाग पडले. आता पुन्हा त्याच गावातील काही आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्या आरोपींकडून पोलीस सोने जप्त करू शकले नाही तर त्यांना सोडावे लागू शकते. त्यामुळे खूप सतर्कतेने पोलिसांना आता आरोपी पकडावे लागतील. (प्रतिनिधी) करमाला येथीलच रहिवाशांवर संशय का? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत जैन यांच्यासह त्यांचा एक सोबत्याचा कधीतरी वाद झाला होता. तो सोबती करमाला तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी जेव्हा करमाला येथील रहिवाशांबाबत चौकशी केली तर फिर्यादीने सांगितले की, एकदा त्यांच्यासह वाद झाला होता. तो व्यक्ती भरत यांच्यासह गोंदियालासुद्धा आलेला आहे. त्यामुळे याच तालुक्यातील रहिवाशांचा हात या चोरीत असावा, असा पोलिसांना संशय आहे. या सर्व बाबींवर पोलीस कार्य करीत आहे की, आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक आहे व त्यांना आधीच ही बाब माहीत होती की भरत कुठून व कसे जातो. याच आधारावर त्यांनी आपला षडयंत्र रचून चोरीची घटना घडविली. रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक संजयसिंह वारंवार पुणे व सोलापूरच्या चकरा याच चोरीच्या तपासकार्यासाठी करतात.