शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

जिल्ह्यात ७१११ घरांची पडझड

By admin | Updated: August 10, 2016 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली.

दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्ती : पाच व्यक्तींचा तर ५८ जनावरांचा घेतला बळी नरेश रहिले गोंदिया नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली. वीज पडून, गोठा पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ५ असून ५८ जनावरांनाही प्राणास मुकावे लागले. त्यात दुधाळू जनावरे ३२ असून ओढकाम करणाऱ्या २६ जनावरांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७५ लाख २७ हजार २०० रुपयांची मदत नागरिकांना करण्यात आली. या आपत्तीदरम्यान गोंदिया तालुक्यात एका व्यक्तीचा आणि एका जनावराचा मृत्यू झाला. तसेच ९० घरे जमीनदोस्त झाली आहेत. ३ हजार ५७२ घरे अंशत पडली. तिरोडा तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६९ घरे जमीनदोस्त झाली. १ हजार ७३ घरे अंशत: पडली. याशिवाय जनावरांचे १०७ गोठे पडले. गोरेगाव तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६५३ घरे जमीनदोस्त झाली. तसेच ६७ गोठे जमीनदोस्त झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला, ११ जनावरांचा मृत्यू झाला १ हजार ८९ घरे जमीनदोस्त झाली. एक गोठाही पडला. देवरी तालुक्यात २९ जनावरांचा मृत्यू झाला तर ३७ घरे जमीनदोस्त झाली. तर ७ गोठेही पडले. आमगाव तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पाच जनावरे ठार, ४९ घरे जमीनदोस्त झाली. सालेकसा तालुक्यात ३७९ घरे जमीनदोस्त झाली. सडक अर्जुनी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू होऊन ५७ घरे जमीनदोस्त झाली. अंशत: ४३ घरे आणि ६५ गोठे पडले. जिल्ह्यात दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्तीत पाच व्यक्तींचा बळी गेला. ५८ जनावरे ठार झाली. २ हजार ४२३ घरे जमीनदोस्त, ४ हजार ६८८ घरांचे अंशत: नुकसान झाले. २४७ गोठे पडले आहेत. जिल्ह्यात ९ आॅगस्टपर्यंत सरासरी ८००.०१ मिमी पाऊस पडायला पाहीजे. परंतु यावर्षी ६७१.६ मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५८६.२ मिमी पाऊस पडला होता. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८५ मिमी जास्त पाऊस पडला आहे. परंतु सरासरी अपेक्षित पावसापेक्षा १२९ मिमी पाऊस कमी झाला आहे. शासनाकडे तीन कोटींची मागणी नैसर्गिक संकटात सापडलेल्या जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत ७५ लाख २७ हजार २०० रूपयांची मदत करण्यात आली. १० लाख १७ हजार ८०० रूपये जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला आणखी तीन कोटीची गरज असल्याने वाढीव रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.