शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

जिल्ह्यात ७१११ घरांची पडझड

By admin | Updated: August 10, 2016 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली.

दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्ती : पाच व्यक्तींचा तर ५८ जनावरांचा घेतला बळी नरेश रहिले गोंदिया नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली. वीज पडून, गोठा पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ५ असून ५८ जनावरांनाही प्राणास मुकावे लागले. त्यात दुधाळू जनावरे ३२ असून ओढकाम करणाऱ्या २६ जनावरांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७५ लाख २७ हजार २०० रुपयांची मदत नागरिकांना करण्यात आली. या आपत्तीदरम्यान गोंदिया तालुक्यात एका व्यक्तीचा आणि एका जनावराचा मृत्यू झाला. तसेच ९० घरे जमीनदोस्त झाली आहेत. ३ हजार ५७२ घरे अंशत पडली. तिरोडा तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६९ घरे जमीनदोस्त झाली. १ हजार ७३ घरे अंशत: पडली. याशिवाय जनावरांचे १०७ गोठे पडले. गोरेगाव तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६५३ घरे जमीनदोस्त झाली. तसेच ६७ गोठे जमीनदोस्त झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला, ११ जनावरांचा मृत्यू झाला १ हजार ८९ घरे जमीनदोस्त झाली. एक गोठाही पडला. देवरी तालुक्यात २९ जनावरांचा मृत्यू झाला तर ३७ घरे जमीनदोस्त झाली. तर ७ गोठेही पडले. आमगाव तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पाच जनावरे ठार, ४९ घरे जमीनदोस्त झाली. सालेकसा तालुक्यात ३७९ घरे जमीनदोस्त झाली. सडक अर्जुनी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू होऊन ५७ घरे जमीनदोस्त झाली. अंशत: ४३ घरे आणि ६५ गोठे पडले. जिल्ह्यात दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्तीत पाच व्यक्तींचा बळी गेला. ५८ जनावरे ठार झाली. २ हजार ४२३ घरे जमीनदोस्त, ४ हजार ६८८ घरांचे अंशत: नुकसान झाले. २४७ गोठे पडले आहेत. जिल्ह्यात ९ आॅगस्टपर्यंत सरासरी ८००.०१ मिमी पाऊस पडायला पाहीजे. परंतु यावर्षी ६७१.६ मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५८६.२ मिमी पाऊस पडला होता. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८५ मिमी जास्त पाऊस पडला आहे. परंतु सरासरी अपेक्षित पावसापेक्षा १२९ मिमी पाऊस कमी झाला आहे. शासनाकडे तीन कोटींची मागणी नैसर्गिक संकटात सापडलेल्या जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत ७५ लाख २७ हजार २०० रूपयांची मदत करण्यात आली. १० लाख १७ हजार ८०० रूपये जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला आणखी तीन कोटीची गरज असल्याने वाढीव रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.