शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७१११ घरांची पडझड

By admin | Updated: August 10, 2016 00:05 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली.

दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्ती : पाच व्यक्तींचा तर ५८ जनावरांचा घेतला बळी नरेश रहिले गोंदिया नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत आलेल्या संकटात जिल्ह्यातील ७ हजार १११ घरांची पडझड झाली. वीज पडून, गोठा पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ५ असून ५८ जनावरांनाही प्राणास मुकावे लागले. त्यात दुधाळू जनावरे ३२ असून ओढकाम करणाऱ्या २६ जनावरांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७५ लाख २७ हजार २०० रुपयांची मदत नागरिकांना करण्यात आली. या आपत्तीदरम्यान गोंदिया तालुक्यात एका व्यक्तीचा आणि एका जनावराचा मृत्यू झाला. तसेच ९० घरे जमीनदोस्त झाली आहेत. ३ हजार ५७२ घरे अंशत पडली. तिरोडा तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६९ घरे जमीनदोस्त झाली. १ हजार ७३ घरे अंशत: पडली. याशिवाय जनावरांचे १०७ गोठे पडले. गोरेगाव तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला तर ६५३ घरे जमीनदोस्त झाली. तसेच ६७ गोठे जमीनदोस्त झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला, ११ जनावरांचा मृत्यू झाला १ हजार ८९ घरे जमीनदोस्त झाली. एक गोठाही पडला. देवरी तालुक्यात २९ जनावरांचा मृत्यू झाला तर ३७ घरे जमीनदोस्त झाली. तर ७ गोठेही पडले. आमगाव तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पाच जनावरे ठार, ४९ घरे जमीनदोस्त झाली. सालेकसा तालुक्यात ३७९ घरे जमीनदोस्त झाली. सडक अर्जुनी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू होऊन ५७ घरे जमीनदोस्त झाली. अंशत: ४३ घरे आणि ६५ गोठे पडले. जिल्ह्यात दोन महिन्यातील नैसर्गिक आपत्तीत पाच व्यक्तींचा बळी गेला. ५८ जनावरे ठार झाली. २ हजार ४२३ घरे जमीनदोस्त, ४ हजार ६८८ घरांचे अंशत: नुकसान झाले. २४७ गोठे पडले आहेत. जिल्ह्यात ९ आॅगस्टपर्यंत सरासरी ८००.०१ मिमी पाऊस पडायला पाहीजे. परंतु यावर्षी ६७१.६ मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५८६.२ मिमी पाऊस पडला होता. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८५ मिमी जास्त पाऊस पडला आहे. परंतु सरासरी अपेक्षित पावसापेक्षा १२९ मिमी पाऊस कमी झाला आहे. शासनाकडे तीन कोटींची मागणी नैसर्गिक संकटात सापडलेल्या जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत ७५ लाख २७ हजार २०० रूपयांची मदत करण्यात आली. १० लाख १७ हजार ८०० रूपये जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला आणखी तीन कोटीची गरज असल्याने वाढीव रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.