शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

३२ सावकारांचे ७०० प्रस्ताव

By admin | Updated: June 7, 2015 01:40 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत सावकारांकडून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांत दुपटीने वाढ झाली असून त्यांच्या आकडा आता ७०० वर पोहोचला आहे.

प्रस्तावांना आला वेग : कर्ज व व्याजाची रक्कम ९२.९३१ लाखांत गोंदिया : कर्जमाफी योजनेंतर्गत सावकारांकडून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांत दुपटीने वाढ झाली असून त्यांच्या आकडा आता ७०० वर पोहोचला आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात फक्त ३७४ प्रस्ताव सावकारांकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांकडून मिळाली होती. यावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. त्यानंतर आठवड्यातच प्रस्तावांची संख्या ७०० वर पोहोचली. यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. सततच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाडा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. मात्र जिल्ह्यात ३० मे पर्यंत तिरोडा व देवरी तालुक्यातून फक्त ३७४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. सावकार व शेतकरी दोघांसाठी अत्यंत लाभदायी या योजनेबाबत लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकत सावकारांना प्रस्ताव सादर करण्यासदंर्भात आवाहन केले होते. याचेच परिणाम म्हणता येणार की, शनिवारपर्यंत (दि.६) प्रस्तावांत दुपटीने वाढ झाली असून ७०० प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उप निबंधकांनी दिली. (शहर प्रतिनिधी)प्रस्ताव सादर करण्यास सावकार उदासीनजिल्ह्यात २०१ परवानाधारक सावकार आहेत. असे असताना फक्त ३२ सावकारांकडून हे ७०० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात तिरोडा तालुक्यातील २५ पैकी १४ सावकारांकडून १५५ प्रस्ताव असून कर्ज व व्याज मिळून ११.९४२ लाख रूपये आहेत. देवरी तालुक्यातील २६ पैकी फक्त ४ सावकारांचे ५४.६२ लाखांचे २६२ प्रस्ताव आहेत. तर यंदा अर्जुनी -मोरगाव तालुक्यातील प्रस्तावही आले असून यात २५ पैकी १४ सावकारांनी २६.३६९ लाख रूपयांचे २८३ प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज व व्याजाच्या रकमेत वाढ झाली असून आता ९२.९३१ लाखांत ही रक्कम गेली आहे.