शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

७० एकर जागा सातबारामधून गायब

By admin | Updated: January 18, 2016 02:10 IST

आसोली येथील तलाठी साझा क्रं. १७ मधील २५ शेतकऱ्यांची जवळपास ७० एकर शेती उपजिल्हाधिकारी गोंदिया...

शासनाचा अजब फतवा : आसोलीच्या २५ शेतकऱ्यांचा आक्रोश आमगाव : आसोली येथील तलाठी साझा क्रं. १७ मधील २५ शेतकऱ्यांची जवळपास ७० एकर शेती उपजिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशान्वये सातबारामधून गायब झाल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये व्यापक रोष निर्माण झाला आहे. आसोली येथील ७० एकर शेतजमीन आसोली लघू प्रकल्पाला देण्यात आली. जेव्हा शेतकरी आपले धान विकण्यासाठी सातबारा घेण्याकरिता गेले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जवळपास २० वर्षांपासून आसोली प्रकल्पाकरिता शासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील शेती विक्रीवर बंदी आहे. तलाठी मेश्राम यांच्याकडे गेंदलाल दुलीचंद भगत हे सातबारा घेण्याकरिता गेले असता उपजिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने तुमची आवश्यकता नाही, असे उत्तर मेश्राम यांनी दिले. गेंदलाल भगत यांची जवळपास १० एकर शेती धरणात जात आहे.शेतकऱ्यांना कसलीही सूचना किंवा नोटीस देण्यात आले नाही. फेरफार पंजीवरसुध्दा सही घेणयात आली नाही. या २५ शेतकऱ्यांकडे आसोली प्रकल्पात शेती गेल्यानंतर शेती शिल्लक राहणार नाही. सदर शेतकरी गेंदलाल भगत हे तहसीलदार राजीव शक्करवार यांच्याकडे जाऊन सातबारा पाहिजे, अशी मागणी केली. तेव्हा तहसीलदार यांनी आम्ही सातबारा देऊ शकत नाही. तुमची जमीन लघू पाटबंधारे विभागाच्या नावे करण्यात आली, असे उत्तर मिळाले. यात गेंदलाल भगत, नारायण डोहरे, रतिराम डोहरे, सदाराम कथलेवार, भागवत भगत व अन्य शेतकरी मिळून २५ शेतकऱ्यांच्या शेती धरणात जात आहेत. प्रतिएकर पाच लाख किंवा जागेबदली जागा किंवा पुनर्वसन करण्यात यावे. आता बाधित शेतकरी यांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांना नोटीस देऊन यात दिवसांची मुदत देण्यात येईल. तसेच न्यायालयात दाद मागू. सदर धरणामुळे सिंचनाचा कुणालाच फायदा नाही. त्यामुळे आता रमन राणे, हंसराज मेश्राम व बाधित शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचे कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)