शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

६९४ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:55 IST

पिण्यासाठी पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे याचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. यात दुसऱ्या टप्प्यात १४३ तर तिसऱ्या टप्प्यात ३९८ गावे व १५३ वाड्यात पाणी टंचाई आढळली. या ६९४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ६९४ गावातील नागरिक टाहो फोडत आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत एकही काम सुरू नाही : पाच कोटी ६४ लाख पडूनच

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पिण्यासाठी पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे याचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. यात दुसऱ्या टप्प्यात १४३ तर तिसऱ्या टप्प्यात ३९८ गावे व १५३ वाड्यात पाणी टंचाई आढळली. या ६९४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ६९४ गावातील नागरिक टाहो फोडत आहेत.पाणी टंचाईच्या पहिला टप्प्यात एकही गावात पाणी टंचाई नव्हती. दुसऱ्या टप्प्याचा कालावधी जानेवारी ते मार्च असा होता. या दुसऱ्या टप्प्यात १४३ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आढळली. यासाठी जिल्हा परिषदेने २७२ उपाययोजना आखल्या. त्यासाठी ७१ लाख १६ हजार रूपये मंजूरही करण्यात आले. परंतु त्यातील एकही रूपया उपाययोजनेवर खर्च करण्यात आला नाही. दुसऱ्या टप्प्याचा कालावधी निघून गेल्यावरही लोकांना पाणी देणे तर सोडा त्या उपाययोजनांचे कामही सुरू झालेले नाही.आपल्या अपयशाचे खापर जिल्हा प्रशासनावर फोडण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील आराखड्याला मंजुरीच मार्च महिन्यात मिळाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांची निवीदा प्रक्रीया सुरूच झाली नाही. १४३ ग्रामपंचायतीपैकी फक्त १५ ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आले आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त पूर्ण ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक आल्याशिवाय निवीदा प्रकीया होणार नाहीत.तिसºया टप्प्याचा कालावधी सुरू होऊनही दुसऱ्याच टप्प्यातील कामाला सुरूवात झाली नसल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. तिसऱ्या टप्प्यात ३९८ गावे व १५३ वाड्यांसाठी एक हजार ५४० उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी चार कोटी ९३ लाख २३ हजार रूपये जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात न झाल्यामुळे तिसऱ्याही टप्प्याला सुरूवात होऊच शकत नाही. जिल्ह्यातील ६९४ गावांत पाण्याची भिषण टंचाई असतांना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नेहमीप्रमाणे यंदाही सुस्त आहे. महिला व बालकांना कोसोदूर जाऊन तहान भागविण्यासाठी पायपीट करावी लागते. इनवेल बोअर, विंधन विहीर व नळ योजना विशेष दुरूस्ती कार्यक्रम राबविणे अपेक्षीत असताना कसल्याही कामाला अद्याप सुरूवात करण्यात आली नाही.जलयुक्त शिवार नावापुरतेचजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असे प्रशासनाकडून दाखविण्यात येते. परंतु ही योजना मुख्यमंत्र्यांची असल्यामुळे निव्वळ त्यांना खूश करण्यासाठी पाण्याची पातळी वाढविल्याचे कागदीघोडे रंगविले जात आहेत. जिल्ह्यात पाण्याची भिषण टंचाई असताना जलयुक्त शिवार अभियानाचा फक्त कांगावाच करण्यात आला आहे. याचा फायदा गावांना झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस पडूनही ६९४ गावात पाण्याची टंचाई भासणे ही तलावाच्या जिल्ह्यासाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.दिलेले पैसेही जातात परतपाणी टंचाईवर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे परत जातो. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१७-१८ या वर्षात दोन कोटी ३३ लाख ४९ हजार रूपयांचा निधी देण्यात आला होता. परंतु यातील २ कोटी १९ लाख ३६ हजार रूपये खर्च करण्यात आले होते. तर १४ लाख १३ हजार रूपये खर्च केलेच नाही. सन २०१८-१९ करीता महसूली क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांचे वीज देयक अदा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला शासनाने ६२ लाख ३ हजार रूपये दिले होते. परंतु त्यातील २२ लाख ३६ हजारच खर्च करून ३९ लाख ७६ हजार रूपये खर्च केलचे नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने निधी दिला तरी तो निधी लोकांच्या हितासाठी खर्च केला जात नाही. तरी देखील अधिकाºयांवर कसलीच कारवाई होत नाही.