शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पावसामुळे ६८ बसफेऱ्या रद्द

By admin | Updated: September 14, 2016 00:19 IST

तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

पुजारीटोलाचे १० गेट उघडले : सालेकसा-देवरी तालुक्यांतील अनेक मार्ग बंदगोंदिया : तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा बराच वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल. शिवाय काही कमी उंचीच्या पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील ६८ फेऱ्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रभारी आगार व्यवस्थापक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे ११, १२ व १३ सप्टेंबर या तीन दिवसपर्यंत सालेकसा तालुक्यातील तब्बल ६८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे बसेसचा दोन हजार ६९० किमीचा प्रवास होवू शकला नसून जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान गोंदिया आगाराला सहन करावे लागले. सालेकसापुढील सर्वच फेऱ्या या तीन दिवसपर्यंत रद्द होत्या. ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्णत: खराब झालेले असून त्यांची सुधारणा न झाल्याने पाऊस आल्यावर त्या मार्गावरील वाहतूक गोंदिया आगाराला बंद करावी लागते. यात दवनीवाडा, बंजारी, शहारवाणी, सालुटोला-मोहगाव व डव्वा मार्गांचा समावेश आहे. पाऊस आल्यावर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आधीचेच हे मार्ग खराब असून पाऊस आल्यावर या रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडते. त्यामुळे गोंदिया आगाराला या मार्गांवरील बस वाहतूक बंद करावी लागते. शिवाय या मार्गावर काही कमी उंचीचे पूल असून त्यावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बाधित होते. दवनीवाडा मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आली होती, मात्र आलेल्या पावसाने रस्ता अधिकच खराब झाल्याचे बसफेरी बंद करावी लागली. बंजारी मार्गावरील फेऱ्या सुरू होणार असल्याचे झाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात सन २०१२ पासून नियमित आगार व्यवस्थापक नाही. मागील चार वर्षापासून येथे प्रभारी आगार व्यवस्थापकच कार्यरत होते. मागील आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर कार्यशाळा अधीक्षक झाडे यांच्याकडे सदर पदाचा प्रभार दिला. त्यामुळे बसफेऱ्या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहीजे याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. (प्रतिनिधी)