शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पावसामुळे ६८ बसफेऱ्या रद्द

By admin | Updated: September 14, 2016 00:19 IST

तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

पुजारीटोलाचे १० गेट उघडले : सालेकसा-देवरी तालुक्यांतील अनेक मार्ग बंदगोंदिया : तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा बराच वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल. शिवाय काही कमी उंचीच्या पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील ६८ फेऱ्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रभारी आगार व्यवस्थापक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे ११, १२ व १३ सप्टेंबर या तीन दिवसपर्यंत सालेकसा तालुक्यातील तब्बल ६८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे बसेसचा दोन हजार ६९० किमीचा प्रवास होवू शकला नसून जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान गोंदिया आगाराला सहन करावे लागले. सालेकसापुढील सर्वच फेऱ्या या तीन दिवसपर्यंत रद्द होत्या. ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्णत: खराब झालेले असून त्यांची सुधारणा न झाल्याने पाऊस आल्यावर त्या मार्गावरील वाहतूक गोंदिया आगाराला बंद करावी लागते. यात दवनीवाडा, बंजारी, शहारवाणी, सालुटोला-मोहगाव व डव्वा मार्गांचा समावेश आहे. पाऊस आल्यावर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आधीचेच हे मार्ग खराब असून पाऊस आल्यावर या रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडते. त्यामुळे गोंदिया आगाराला या मार्गांवरील बस वाहतूक बंद करावी लागते. शिवाय या मार्गावर काही कमी उंचीचे पूल असून त्यावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बाधित होते. दवनीवाडा मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आली होती, मात्र आलेल्या पावसाने रस्ता अधिकच खराब झाल्याचे बसफेरी बंद करावी लागली. बंजारी मार्गावरील फेऱ्या सुरू होणार असल्याचे झाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात सन २०१२ पासून नियमित आगार व्यवस्थापक नाही. मागील चार वर्षापासून येथे प्रभारी आगार व्यवस्थापकच कार्यरत होते. मागील आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर कार्यशाळा अधीक्षक झाडे यांच्याकडे सदर पदाचा प्रभार दिला. त्यामुळे बसफेऱ्या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहीजे याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. (प्रतिनिधी)