शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

तालुक्यातील ६८ अंगणवाड्या पाण्याविना

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

जिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत.

शौचालय व आवारभिंतीची गरज : दोन अंगणवाड्या सुरू होण्याच्या मार्गावर विजय मानकर सालेकसाजिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत. यात १६६ मोठ्या आणि ३३ मिनी अंगणवाड्या चालत असून दोन अंगणवाड्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु १९९ पैकी ६८ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसून या आंगणवाडीतील चिमुकले व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी इतर ठिकाणच्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे ३४ आंगणवाड्यांत शौचालयाची व्यवस्था नसून काहींचे शौचालय निकामी झाले आहेत. तर काही ठिकाणी मुद्दाम शौचालय बांधकाम झालेले नाही. त्यामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना पाणी व शौचालयाच्या बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागत असते.अंगणवाडीमध्ये ३ ते ५ वर्ष वयोगटातील मुले-मुली पूर्व प्राथमिक स्तराचे शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अंगणवाडी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक आहे. अंगणवाडीत योग्य रित्या पूर्व प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे विद्यार्थी प्राथमिक शाळेत नवीन आवड व उत्साह घेऊन जातात. परंतु त्याआधी त्याला अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. तसेच यासाठी त्या चिमुकल्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे. लहान मुलांचा विचार केला तर त्यांना मुलभूत सोयीमध्ये पूरक आहारासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शौचालय आदी अती आवश्यक असते. शासनस्तरावर यासाठी अनेक उपक्रम राबवून पुरेपूर प्रयत्न केला जातो. तरी सुद्धा जीरो ग्राऊंडवर अनेक समस्या कायम असतात व हे अनेक वेळा प्रत्यक्षात पाहावयास मिळत असते. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक आंगणवाड्यांना आवारभिंत आवश्यक असून आरोग्याच्या दृ्टीने त्यांना मिळणारा पूरक आहार सुद्धा पोषक व शुद्ध असला पाहिजे. असे असतानाही तालुक्यात अजूनही ९४ अंगणवाड्यांना आभारभिंत नसून १८ अंगणवाड्यांत किचनशेडची सोय नाही. हे त्या अंगणवाड्यांसाठी दुदैव म्हणावे लागेल. अंगणवाडीची व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या देखरेखीत असली तरी यासाठी मिळणारे अनुदान केंद्र शासनाकडून येते. केंद्र शासन नेहमी पुरेपूर अनुदान देण्याचा प्रयत्न करते. तरीसुद्धा अंगणवाडीमध्ये सोयीचा अभाव हा चिंतेचा विषय आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या ९२ हजार ४१९ असून यात ४६ हजार ६०० पुरुष तक ४५ हजार ८९१ स्त्रिया आहेत. यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सात हजार ९७६ बालके असून शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची संख्या चार हजार १०४ आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक तीन हजार ८७२ आहेत.अंगणवाडीमध्ये शिकणारे विद्यार्थी हे तीन ते सहा वर्ष वयोगटातील असतात. त्यांना स्वत: निट ठेवणे जमत नाही. त्यामुळे त्यांना अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे.९० आंगणवाड्यांत अमृत आहार योजनाभारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत तालुक्यातील एकूण ३५ गावातील ९० अंगणवाडी केंद्राअंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबविली जात आहे. गरोदर मातांची संख्या २३२ आणि स्तनदा मातांची संख्या २९२ असून एकूण ५२४ मातांना अमृत आहार योजनेचा लाभ मिळत आहे.