शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

तालुक्यातील ६८ अंगणवाड्या पाण्याविना

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

जिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत.

शौचालय व आवारभिंतीची गरज : दोन अंगणवाड्या सुरू होण्याच्या मार्गावर विजय मानकर सालेकसाजिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत. यात १६६ मोठ्या आणि ३३ मिनी अंगणवाड्या चालत असून दोन अंगणवाड्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु १९९ पैकी ६८ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसून या आंगणवाडीतील चिमुकले व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी इतर ठिकाणच्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे ३४ आंगणवाड्यांत शौचालयाची व्यवस्था नसून काहींचे शौचालय निकामी झाले आहेत. तर काही ठिकाणी मुद्दाम शौचालय बांधकाम झालेले नाही. त्यामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना पाणी व शौचालयाच्या बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागत असते.अंगणवाडीमध्ये ३ ते ५ वर्ष वयोगटातील मुले-मुली पूर्व प्राथमिक स्तराचे शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अंगणवाडी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक आहे. अंगणवाडीत योग्य रित्या पूर्व प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे विद्यार्थी प्राथमिक शाळेत नवीन आवड व उत्साह घेऊन जातात. परंतु त्याआधी त्याला अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. तसेच यासाठी त्या चिमुकल्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे. लहान मुलांचा विचार केला तर त्यांना मुलभूत सोयीमध्ये पूरक आहारासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शौचालय आदी अती आवश्यक असते. शासनस्तरावर यासाठी अनेक उपक्रम राबवून पुरेपूर प्रयत्न केला जातो. तरी सुद्धा जीरो ग्राऊंडवर अनेक समस्या कायम असतात व हे अनेक वेळा प्रत्यक्षात पाहावयास मिळत असते. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक आंगणवाड्यांना आवारभिंत आवश्यक असून आरोग्याच्या दृ्टीने त्यांना मिळणारा पूरक आहार सुद्धा पोषक व शुद्ध असला पाहिजे. असे असतानाही तालुक्यात अजूनही ९४ अंगणवाड्यांना आभारभिंत नसून १८ अंगणवाड्यांत किचनशेडची सोय नाही. हे त्या अंगणवाड्यांसाठी दुदैव म्हणावे लागेल. अंगणवाडीची व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या देखरेखीत असली तरी यासाठी मिळणारे अनुदान केंद्र शासनाकडून येते. केंद्र शासन नेहमी पुरेपूर अनुदान देण्याचा प्रयत्न करते. तरीसुद्धा अंगणवाडीमध्ये सोयीचा अभाव हा चिंतेचा विषय आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या ९२ हजार ४१९ असून यात ४६ हजार ६०० पुरुष तक ४५ हजार ८९१ स्त्रिया आहेत. यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सात हजार ९७६ बालके असून शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची संख्या चार हजार १०४ आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक तीन हजार ८७२ आहेत.अंगणवाडीमध्ये शिकणारे विद्यार्थी हे तीन ते सहा वर्ष वयोगटातील असतात. त्यांना स्वत: निट ठेवणे जमत नाही. त्यामुळे त्यांना अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे.९० आंगणवाड्यांत अमृत आहार योजनाभारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत तालुक्यातील एकूण ३५ गावातील ९० अंगणवाडी केंद्राअंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबविली जात आहे. गरोदर मातांची संख्या २३२ आणि स्तनदा मातांची संख्या २९२ असून एकूण ५२४ मातांना अमृत आहार योजनेचा लाभ मिळत आहे.