शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळांच्या ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:51 IST

जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : शिक्षण विभाग बिनधास्त

अंकुश गुंडावार ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र गंभीर प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नाही.काही दिवसांपूर्वी जीर्ण इमारत कोसळून अनेकांचा जीव गेल्याची घटना मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमातींचा मुद्दा सर्वत्र पुन्हा एका चर्चेत आला. मात्र यापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कसालाही बोध घेतला नाही.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०६९ शाळा असून यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे १ लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे डिजीटलपासून ते सेमी इंग्रजीचे वर्ग आणि कॉन्हवेंट सुरू केले जात आहे. तसेच खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. मात्र शाळांमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १०६९ शाळांच्या इमारतींपैकी बहुतेक इमारती जीर्णावस्थेत आहेत. जि.प.बांधकाम विभागातर्फे दरवर्षी केवळ या इमारतींची डागडूजी करुन या इमारती योग्य असल्याचे दाखविले जाते. मात्र या सर्व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण ३८१७ वर्गखोल्यांपैकी केवळ २५०८ वर्गखोल्या चांगल्या स्थितीत तर तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत असून त्या केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अहवाल जि.प.बांधकाम विभागाने दिला आहे. मात्र यानंतरही शिक्षण विभागासह प्रशासनाला त्यांचे गांर्भिय पटलेले नाही. विशेष म्हणजे या जीर्ण वर्गखोल्यांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना अद्यापनाचे कार्य सुरूच असल्याची माहिती आहे. या वर्गखोल्यांची स्थिती पाहता त्या त्वरीत पाडून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे असल्याचा अहवाल सर्व शिक्षा अभियानाच्या बांधकाम विभागाने जि.प.शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. यावर शिक्षण विभागाने कुठलीच उपाय योजना सुरू केल्या नसल्याची माहिती आहे.अनेक शाळांचे बांधकाम ३५ वर्षांपूर्वीचेजिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतीचे बांधकाम ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे काही जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे अपेक्षीत आहे. मात्र जि.प. प्रशासनासह शिक्षण विभागाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे.बांधकामासाठी हवा १० कोटी रुपयांचा निधीजिल्ह्यातील जि.प.शाळा इमारतींची दुरूस्ती आणि नवीन वर्गखोल्या बांधकामाकरिता १० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र ऐवढा निधी उपलब्ध होत नसल्याने वर्गखोलींचे बांधकाम रखडल्याची माहिती या विभागाच्या अधिकाºयांनी दिली.