शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यात ६७ टक्केच वृक्षारोपण

By admin | Updated: July 8, 2015 01:43 IST

जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते.

सामाजिक वनीकरण : पाऊस पडल्यास १० जुलैपर्यंत उद्दिष्टपूर्तीगोंदिया : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते. यंदा एक लाख दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ६७ टक्केच वृक्ष लागवड जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता पाऊस खोळंबल्यामुळे उर्वरित वृक्ष लागवड लांबणीवर जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.यंदा सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात एक लाख २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद, बी अँड सी, जिल्हाधिकारी आदींच्या जमीन पाहणीत काही जागा वृक्ष लागवडीसाठी अयोग्य आढळली. त्यामुळे जिल्ह्यात एक लाख १० वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात १२ नर्सरी आहेत. तिथून रोपटे मागविले जातात. सामाजिक वनीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावरच सदर नर्सरीचे संचालक उर्वरित रोपटे विक्री करतात. तसेच वृक्ष लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून खड्डे तयार केली जातात. या मजुरांचे तहसील कार्यालयात ई-मस्टर असते. त्याद्वारे सरळ त्यांच्या बँक खात्यात त्यांची मजुरी जमा केली जाते, असे सांगण्यात आले आहे. सध्या जिल्हाभरात ७३ हजार ६६० रोपट्यांची लागवड करण्यात आली असून याची टक्केवारी ६७ टक्के आहे. तर ३६ हजार ३४० रोपट्यांची लागवड बाकी आहे. पाऊस नियमित पडले तर पुढे या रोपट्यांची लागवड केली जावू शकेल. मात्र सद्यस्थितीत पाऊस खोळंबल्याने उर्वरित वृक्ष लागवड सध्या प्रलंबित आहे. (प्रतिनिधी)लागवड दरवर्षी, मात्र संवर्धनाकडे दुर्लक्षसामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. त्यांच्या संरक्षणासाठी ट्री-गार्डची सोय मात्र केली जात नाही. केवळ काड्या-काट्यांचेच कुंपन केले जाते. हे कुंपन दोन-तीन दिवसांतच उखडते. शेळ्या-मेंढ्या व गुरा-ढोरांकडून हे कुंपन व रोपटे नष्ट केले जातात. शिवाय काही ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने रोपटे वारतात. वृक्षांची लागवड तर दरवर्षीच केली जाते, मात्र त्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आतापर्यंत लावलेल्या रोपट्यांपैकी किती रोपटे जिवंत आहेत, याची नोंदच संबंधित विभागाकडे नसते. त्यामुळे या योजनेचाच बट्ट्याबोळ होताना गावागावांत दिसून येत आहे.