शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

६७ तासांपासून १० गावे अंधारात

By admin | Updated: June 25, 2015 00:48 IST

उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला.

अधिकारी उदासीन : झाडांच्या फांद्या येतात मधातकाचेवानी : उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला. सायंकाळी ७ वाजतापासून सतत तीन दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागले.पावसाळ्याचे दिवस आले की, माणूस व प्राण्यांना जपून राहावे लागते. अशावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि विद्युत विभाग नागरिकांना योग्य सोई व सुविधा देण्यासाठी काळजी घ्यायची असते. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.मंगळवार (दि. १६) ला सायंकाळी ६.३० दरम्यान वादळासह पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ११ वाजता विद्युत सुरु केल्यानंतर लगेच पुन्हा बंद करण्यात आला. सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास सतत दोन दिवस संपूर्ण रात्र आणि दिवस विद्युत पुरवठा बंद होता. (दि.१९) ला सायंकाळी ७.१५ दरम्यान विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला.सतत तीन दिवस व रात्र अंधारात राहणारी गावे बरबसपुरा, धामनेवाडा, निमगाव, इंदोरा, मेहंदिपूर, भिवापूर व अन्य चार गावांचा समावेश आहे. यापैकी तीन गावे जंगल परिसरात असल्याने भर पावसाळ्यात विजेची समस्या नेहमीची आहे. पावसाळा सुरु झाला असून वीज खंडीत होण्याची समस्या सर्व नागरिकांकरीता चिंतेची बाब बनली आहे. रात्रीच्या वेळी सात दाने असणारा किडा, विंचू, साप आदी विषारी जातीचे किडे दिसून येतात. या व्यतिरिक्त शेकडो जाती, प्रजातीचे किडे दिसून चावण्याची भिती असते. पावसाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा नियमित असायला पाहिजे. परंतु दहा गावातील नागरिकांना ६७ तासापासून अंधारात आहेत. (वार्ताहर)फांद्या कापल्यास अडचण दूरअंधारात असलेली ही गावे जंगल परिसरात असल्याने या गावांना विजेचा पुरवठा जंगलातून आणि शेतशिवारातून होत असते. विजेच्या तारावर तसेच आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यांचा वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होतोे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी वीज पुरवठा होणाऱ्या वाहीन्यांचा मार्ग सुरळीत करणे गजरेचे होते. मात्र, याकडे वीज अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वीज कनेक्शन आणि वीज चोरी पकडण्याच्या नावे लाखो रुपयाची अवैध कमाई केल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे. अशीच परिस्थिती २०१२ आणि २०१३ या दोन वर्षात धामनेवाडा आणि बरबसपुरा या दोन वर्षात होती. एकूण दिवसाच्या निम्मे दिवस चांगल्या प्रकारे ग्राहकांला विजेचा वापर करता आला नाही. अशीच स्थिती यावर्षीसुद्धा दिसून येत आहे.