शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

६७ तासांपासून १० गावे अंधारात

By admin | Updated: June 25, 2015 00:48 IST

उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला.

अधिकारी उदासीन : झाडांच्या फांद्या येतात मधातकाचेवानी : उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला. सायंकाळी ७ वाजतापासून सतत तीन दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागले.पावसाळ्याचे दिवस आले की, माणूस व प्राण्यांना जपून राहावे लागते. अशावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि विद्युत विभाग नागरिकांना योग्य सोई व सुविधा देण्यासाठी काळजी घ्यायची असते. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.मंगळवार (दि. १६) ला सायंकाळी ६.३० दरम्यान वादळासह पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ११ वाजता विद्युत सुरु केल्यानंतर लगेच पुन्हा बंद करण्यात आला. सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास सतत दोन दिवस संपूर्ण रात्र आणि दिवस विद्युत पुरवठा बंद होता. (दि.१९) ला सायंकाळी ७.१५ दरम्यान विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला.सतत तीन दिवस व रात्र अंधारात राहणारी गावे बरबसपुरा, धामनेवाडा, निमगाव, इंदोरा, मेहंदिपूर, भिवापूर व अन्य चार गावांचा समावेश आहे. यापैकी तीन गावे जंगल परिसरात असल्याने भर पावसाळ्यात विजेची समस्या नेहमीची आहे. पावसाळा सुरु झाला असून वीज खंडीत होण्याची समस्या सर्व नागरिकांकरीता चिंतेची बाब बनली आहे. रात्रीच्या वेळी सात दाने असणारा किडा, विंचू, साप आदी विषारी जातीचे किडे दिसून येतात. या व्यतिरिक्त शेकडो जाती, प्रजातीचे किडे दिसून चावण्याची भिती असते. पावसाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा नियमित असायला पाहिजे. परंतु दहा गावातील नागरिकांना ६७ तासापासून अंधारात आहेत. (वार्ताहर)फांद्या कापल्यास अडचण दूरअंधारात असलेली ही गावे जंगल परिसरात असल्याने या गावांना विजेचा पुरवठा जंगलातून आणि शेतशिवारातून होत असते. विजेच्या तारावर तसेच आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यांचा वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होतोे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी वीज पुरवठा होणाऱ्या वाहीन्यांचा मार्ग सुरळीत करणे गजरेचे होते. मात्र, याकडे वीज अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वीज कनेक्शन आणि वीज चोरी पकडण्याच्या नावे लाखो रुपयाची अवैध कमाई केल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे. अशीच परिस्थिती २०१२ आणि २०१३ या दोन वर्षात धामनेवाडा आणि बरबसपुरा या दोन वर्षात होती. एकूण दिवसाच्या निम्मे दिवस चांगल्या प्रकारे ग्राहकांला विजेचा वापर करता आला नाही. अशीच स्थिती यावर्षीसुद्धा दिसून येत आहे.