शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

64 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांचा कालावधी शिल्लक : ग्रामपंचायत निवडणूक, सभा बैठकांचे सत्र झाले सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मात्र यापूर्वी केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्याने अर्ज दाखल करता आले नाही. सोमवारी (दि.२८) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही अर्ज भरण्यासाठी वेग आला नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मंगळवार आणि बुधवारी या दोनच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करुन त्याची मूळ प्रत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याची अट ठेवली आहे.त्यामुळे खाते उघडण्यासाठी सुध्दा मतदारांना बरीच पायपीट करावी लागत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असल्याचे बोलल्या जाते.पुढील दोन दिवसठरणार महत्वपूर्णग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक हे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.