शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

64 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांचा कालावधी शिल्लक : ग्रामपंचायत निवडणूक, सभा बैठकांचे सत्र झाले सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मात्र यापूर्वी केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्याने अर्ज दाखल करता आले नाही. सोमवारी (दि.२८) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही अर्ज भरण्यासाठी वेग आला नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मंगळवार आणि बुधवारी या दोनच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करुन त्याची मूळ प्रत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याची अट ठेवली आहे.त्यामुळे खाते उघडण्यासाठी सुध्दा मतदारांना बरीच पायपीट करावी लागत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असल्याचे बोलल्या जाते.पुढील दोन दिवसठरणार महत्वपूर्णग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक हे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.