शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

64 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांचा कालावधी शिल्लक : ग्रामपंचायत निवडणूक, सभा बैठकांचे सत्र झाले सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मात्र यापूर्वी केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्याने अर्ज दाखल करता आले नाही. सोमवारी (दि.२८) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही अर्ज भरण्यासाठी वेग आला नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मंगळवार आणि बुधवारी या दोनच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करुन त्याची मूळ प्रत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याची अट ठेवली आहे.त्यामुळे खाते उघडण्यासाठी सुध्दा मतदारांना बरीच पायपीट करावी लागत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असल्याचे बोलल्या जाते.पुढील दोन दिवसठरणार महत्वपूर्णग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक हे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.